कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.
पुनर्जन्माचं तसं काय फिक्स नसतंय. किती टाईम
लागेल काय सांगता येत नाय..!
म्हणजे असं बघा की जुनी गोष्ट आहे..! साधारण दोनेक हजार
वर्षें झाली असतील...! तेव्हा आपल्या भागात सातवाहन
वगैरेंचं राज्य होतं..
त्यांची एक राजकन्या होती.. आणि मला ती आवडायची.
अर्थात, माझ्यासारख्या हजारो फाटक्या मनुष्यांना
ती आवडत असणार हे साहजिकच आहे..
आणि हे तिच्या खिजगणतीतही नसणार, हे ही स्वाभाविकच
म्हणावे लागेल.!
नॉर्मली ते तसेच असते..!
समजा.
- हे शक्य नाही, याला काय आधार, हे अशास्त्रीय आहे वगैरे सगळे बाजूला ठेवून -
समजा की पुनर्जन्म आहे. ऐच्छिक आहे. पुनर्जन्म घ्यायचा की नाही हे ऐच्छिक आहे आणि घ्यायचा असल्यास पुढचा जन्म कुठल्या जागी, कुठल्या घरात घ्यायचा हे तुम्हाला ठरवता येईल.
तर तुम्ही पुनर्जन्म घ्याल का? नसल्यास का नाही?
घ्यायचा असल्यास तुम्हाला कुठे म्हणजे कुठल्या देशात, राज्यात, शहरात, गावात घ्यायला आवडेल? कुठल्या प्रकारच्या घरात घ्यायला आवडेल? स्त्री जन्म घ्यायला आवडेल की पुरुष जन्म?
या जन्मी अशी काही चूक केली किंवा काही राहून गेले, जे पुढल्या जन्मी दुरुस्त करायला आवडेल?
मायकल न्यूटन लिखित जर्नी ऑफ सोल्स पुस्तकात वर्णन केलेले महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -
15 - स्पिरिट वर्ल्ड मध्ये परतल्यानंतर , गाईड आणि प्रगत आत्म्यांच्या पॅनेलसोबत चर्चा झाल्यानंतर आत्मा आपल्या ग्रुपसोबत राहायला जातो .
काहीवेळा आधी ग्रुपची भेट आणि नंतर सावकाश गाईड व पॅनेल सोबत चर्चा असाही क्रम होतो .
16 - या पुस्तकानुसार मृत्यूनंतर नरक , जहन्नम , हेल असे कोणतेही प्रकार अस्तित्वात नाहीत . पृथ्वीवरच्या पापकृत्यांची शिक्षा ठरवायला वर बसलेली कमिटी नाही .
हे कदाचित अन्याय्य किंवा टू गुड टू बी ट्रू वाटू शकेल पण तसं नाही .
पुनर्जन्म ,सत्य की आभास ? … (भाग 1)
पुनर्जन्म
उन्हे कधीचीच उतरली
अंधारात हरवल्या सावल्या
गिळण्यास उजेडाला
काळरात्री सरसावल्या
कसे दिसतील अश्रू
श्रावण सरी ज्या बरसल्या
ऐन वर्षा ऋतूत हळव्या
आठवणीं ज्या तरसल्या
दिसे एकच आशेचा किरण
घेतली होती आपण आण
नको विसरू या जन्मी नाही तर
घेऊ पुन्हा पुन्हा जन्म आपण
राजेंद्र देवी
पुनर्जन्म
पुनर्जन्म हा साठीनंतर
ज्येष्ठ नागरिक, वय सात
जुने जगणे सरले आता
नवजीवनाची करूया बात
काळोखाच्या रात्री कधी
कधी चाललो बिकट वाट
नव्या युगाची वाट पहाते
उज्वल रम्य पहाट
संध्यासमयी सांज फुलली
क्षितिजावरती रंग बरसात
सूर्य अजून तळपत राही
मम प्रियेची जोवर साथ
दूर पुढे दिसते अजून
मंद दिव्याची तेवत वात
नव्या दमाने जगण्यासाठी
आम्ही टाकली कात
अस्त होई कधी तरी
जरी मोक्ष सागरात
पार करू भवसागरही
घेऊन हातात हात
पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था
पुनर्जन्म हा तसा अनेक मायबोलीकरांच्या आणि तथाकथीत बुध्दीपामाण्यावाद्यांच्या दृष्टिने चेष्टेचा, टिंगल टवाळीचा आणि टीका करण्याचा विषय आहे. भारतात हिंदु धर्म असा आहे की जो कर्मसिध्दांत आणि त्याला जोडुन असलेले प्रारब्ध्द आणि त्याला जोडुन येणारा पुनर्जन्म ह्या विषयाला मान्यता देणारा आहे. याच कारण हा धर्म किंवा जड वाटत असेल तर संस्कृती म्हणा एका पुस्तकाच्या आधाराने चालणारा नाही. अनेक ग्रंथ गुढ अश्या विषयावर भाष्य करताना दिसतात तसेच आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालताना दिसतात.
पुनर्जन्म (भाग २)
विचार करता करता आईचं घर कधी आलं हे कळलंच नाही निलूला. विचारात मन खोल गुंतलं की, आपलं बरचसं अंतर ते विचारच कापतात. विचार करतच दाराची बेल वाजवली तिने.
"निलू आली वाटतं. जा जा उघड दार लवकर." बाबा आईला म्हणाले. नातवाला भेटायची घाई त्यांनाही तितकीच होती जितकी आईंना.
दार उघडताच आदुने आपल्या आजीला एकदम जोरात मिठी मारली. खूप दिवसांनी भेटत होता तो आपल्या आजी-आजोबांना. घराच्या भांडणात मुलांची प्रेमं मात्र पोरकी होतात.
'कोण चूक आणि कोण बरोबर' ह्याचं उत्तर संसारात झालेलं नुकसान कधीच भरून काढू शकत नाही.
आजीने आपल्या नातवाचे बरेचसे मुके घेतले.
पुनर्जन्म (भाग १)
फोनची रिंग वाजली.
"आले आले. जर धीर धरवत नाही या लोकांना!" नीलू आतूनच ओरडली. रोजच्या कामाच्या गडबडीत असा फोन वाजला की, राग येतोच. कारण फोन कुणाचा आहे हे तो उचलल्याशिवाय कळत नाही ना.
कामाच्या गडबडीत विस्कटलेले केस मागे घेत नीलू फोनजवळ आली. फोनच्या जवळ बसलेल्या, खिदळनाऱ्या छोट्या आदुला पाहून तिला अजूनच राग आला.
"तुला काय झालंय रे हसायला कार्ट्या!"
"अगं मम्मा, तुझं 'आले आले' त्या फोनवरच्या माणसाला ऐकायला तरी जाणारय का?"
"हो का? हि अक्कल बरीय तुला. इथे बसलायस तर फोन उचलता नाही का आला? ती अक्कल कशी नाही सुचली तुला?"