शीर्षक :- माणसं
सुकलेल्या पानांना जाळतात ही माणसं
नंतर राख झाल्यावर रडतात ही माणसं
खचलेल्या भिंतींना देतात आधार कशाला?
उपकार सुद्धा हसून सांगतात ही माणसं
क्षणाक्षणाला देतात इतक्या यातना
इथे जिवंतपणीच मारतात ही माणसं
सुरकुत्या चेहऱ्याला आनंदी ठेवण्यास
दोन शब्द ही बोलणे टाळतात ही माणसं
आज ना उद्या देह हा विझणारच
मग मीपणाचा गर्व का बाळगतात ही माणसं
- विनोद नंदू इखणकर
नाशिक (शब्दप्रेम)
७३५०९७०२०१
साल: कितीतरी वर्षांपूर्वी. स्थळ: अमेरिका, पात्र: मराठी माध्यमात शिकलेली नवविवाहिता, नाट्य: घडवू ते!
नमस्कार मायबोलीकर …
इथे व्यक्त होण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.
एक नविन विचार मांडत आहे. कसं वाटतंय लेखन जरूर सांगा... 
अगदी लहानपणी शाळेत असताना बाईंनी चित्रकलेतील हा नवीन प्रकार शिकवलेला आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे कागदी छोटे-छोटे तुकडे एकत्र करून त्यापासून एक नवीन अर्थपूर्ण चित्र तयार करणे. मला हे असं कोलाज बनविण फार आवडायचं आणि लहानपणी शाळेत असताना बनवलेली कोलाज अजूनही जपून ठेवली आहेत मी.
असतात ना!
या जगात विक्षिप्त माणसं असतात!
एखाद्याची एखादी सवय विक्षिप्त असते, तर एखाद्याचा स्वभाव विक्षिप्त असतो. कोणी कधीतरीच विक्षिप्तपणा दाखवतो, तर कोणी प्रसंगानुरूप व्यक्त होतो.
........... पण ती सारी एकाच दिवशी भेटावीत!
असेच तीन चार महिने गेले. संध्याकाळी सहा-साडेसहाचा सुमार. मी एकटाच ऑफिस मध्ये काहीतरी वाचत बसलो होतो.
"सर, आत येऊ" असे विचारणारा जरासा ओळखीचा आवाज आला.
दारात सोनटक्के आणि त्यांच्या सोबत एक स्त्री, त्यांची बायको, आत येण्याची परवानगी मागत होते.
सोनटक्केंना पाहताच माझा राग उफाळून आला. आणि मग त्या रागामुळेच माझ्या स्वर कुत्सित झाला आणि बोलण्यात खोचकपणा आला असावा.
"या, सोनटक्के, कसे काय आलात? मला वाटले विसरलात. गरज सरो, वैद्य मरो असे ऐकले होते, पण तुम्ही गरज सरो, वकील मरो असेच वागलात"
"तसे नाही साहेब. सॉरी, म्हणजे माझी चूकच झाली. पण काय आहे की ..."
आपल्याला भेटलेल्या, भेटत असलेल्या अनेक व्यक्तींबद्दल आपली काही मते तयार होतात. ही मते त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, बोलण्यावरून आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या वागणुकीवरून तयार होतात.
मग त्यांना आपण मित्र, शत्रू किंवा चांगला, बरा, वाईट माणूस म्हणून आपल्या मनाच्या ज्या त्या कप्प्यात बंदिस्त करून टाकतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीशी आपल्या प्रतिसादाच्या, वागण्याच्या पद्धती ठरवून टाकतो.
पण आयुष्य इतके, सरळ, सहज सोपे कुठे असते? कारण अचानक ... आपल्या मतांना, कल्पनांना छेद देऊन ती व्यक्ती अशी काही वागते की आपण अचंबित, आश्चर्यचकित होऊन जातो.