नमस्कार मायबोलीकर …
इथे व्यक्त होण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.
एक नविन विचार मांडत आहे. कसं वाटतंय लेखन जरूर सांगा... 
अगदी लहानपणी शाळेत असताना बाईंनी चित्रकलेतील हा नवीन प्रकार शिकवलेला आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे कागदी छोटे-छोटे तुकडे एकत्र करून त्यापासून एक नवीन अर्थपूर्ण चित्र तयार करणे. मला हे असं कोलाज बनविण फार आवडायचं आणि लहानपणी शाळेत असताना बनवलेली कोलाज अजूनही जपून ठेवली आहेत मी.
सुगंधी कट्टा:
हा आहे दौरा एका आठवाचा स्मृतीतल्या साठवाचा
वळणावळणानी उलगडतील चित्रांच्या लडी
तुम्हीसुद्धा सामील व्हा ह्या प्रवासात दोन घडी.
धुक्यात हरवलेल्या शोधताना वाटा जुन्या आठवणींचा सापडेल का पत्ता?
जिवाभावाच्या मित्रांचे सुटलेले धागे काळाबरोबर सरले मागे.
पण मग त्या सरलेल्या दिवसांचे काय?
प्रवाहात भेटलेल्या जीवालागांच काय?
काहीच नात उरलं नाही ?
कि बरेच दिवसात भूतकाळात डोकावलोच नाही?
आणखी एक विचारू तुम्हाला?
मला सांगा मित्रांना इतक्यात विसरलात काहो?
भान हरपलेले ते दिवस खरंच सांगा, कुठे विरले काहो?
कुठे गेल्या ह्या आठवणी? कसं वाढलं अंतर....
मस्त भुरभूर पाऊस चालु होता. आता शहरापासुन थोडं बाहेर आल्यावर ड्रायविंग पण संथ, एका लयीत चालु होतं. गाडितली म्युझिक सिस्टिम शांत होती पण मनात बडे गुलाम अली घुमत होते.. "आये ना बालम.. का करु सजनी.." शहराबाहेर कुठेतरी शिफ्टिंगचं सामान घेवुन चाललेला ट्रक दिसला तिला गाडीपुढे..
कितव्या शहरातलं कितवं शिफ्टिंग होतं हे काय माहिती..त्या न मोजता येणार्या पसार्यात तशाच न मोजता येण्यासारख्या आठवणी.. त्यांचे फोटोग्राफीचे प्रयोग...
"अर्रे हळू....!!!"
"काय?"
"आठवणींची कुपी अलगद उघडायची असते.. सांडुन गेली अत्तरासारखी तर दरवळ राहिल फक्त.. आणि तोही पकडता यायचा नाही मग..!"