आम्ही आमच्या नंबरची सीट हुडकून त्यावर बसलो. एका 'हवाईसुंदरी'च्या मदतीने, हिची हातातली बॅग आणि माझी लॅपटॉपची बॅकसॅक, सीटवरील रॅक मध्ये सारून दिल्या. सीटवर पाघरायची शाल, एक चिटूर्नि उशी, आणि हेडफोनचे पाकीट होते. समोरच्या सीटच्या पाठीवर एक मॉनिटर होता. खूप 'प्रयत्न-प्रामादा'(Trail -error साठी हा शब्द कोठेतरी वाचला होता. कसा आहे?) नंतर, या स्क्रीनने माझी पंधरा तास करमणूक केली होती. दोन सिनिमे मी पहिले, एक त्यानेच दाखवला!
शेवटी तो दिवस उजाडलाच. मुंबईहून रात्री अकरा वीसची फ्लाईट होती, म्हणून दुपारी बारालाच गाडी सांगितली होती. बारा वाजून गेले गाडीचा पत्ता नाही! फोन केला, तर तो फोन उचलेना! नेहमी मी 'विक्रांत' टूर कडे गाडी बुक करतो. आजवर असे कधीच झाले नव्हते. माझ्या पोटात गोळा आला. काय झाले असेल? गाडीचा प्रॉब्लेम? ड्रॉयव्हरचा? का मालकाचा? तगमग सुरु झाली. ऑस्टिनची फ्लाईट मिस झाली तर? अहमदनगर ते मुंबई किमान सहा तास. स्वयंपाकाचा राडा नको म्हणून वाटेत जेवण्याचे ठरवले होते. त्यासाठी तास दीड तास लागणारच होता. शिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास, एअरपोर्टवर तीन तास वेळेआधी पोहचावे लागणार होते.
९ दिवस आणि ३५०० मैल गाडी हाकायची ठरली तेव्हा मी माझं Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान घरातल्या घरातच करायचं ठरवलं पण दरवर्षीच्या नेमामध्ये कोविड काळ येऊ न देता कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं, विमानाने न जाता गाडीने प्रवास करायचा या विचारावर मुलं ठाम होती. शेवटी गाडी कशी चालवायची याबद्दल हजार सूचना तोंडी दिल्यावर माझं समाधान झालं पण सूचना लिखित पाहिजेत अशी सूचना आली. मी लिहिलेल्या पाच सूचनांनंतर, ६ क्रमांकावर आईने ओरडत बसायचं नाही ही सूचना मुलांनी घुसडवली आणि हल्लीच गाडी शिकलेल्या मुलीने घरातली ती सर्वोत्कृष्ट वाहन चालक असल्याचा निर्वाळाही दिला.
कळायला लागल्यानंतर जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे मला खिडकी कायम आवडते.खिडक्यांच हे माझ वेड खूप जून आहे.आमचं मुरूडच घर खूप जून आणि पारंपारिक कोकणी पद्धतीच आहे. त्या घराला कोनाडे,खुंट्या,अडसर आणि तश्याच जुन्या पद्धतीच्या ‘खिडक्या’ तर खिडक्यांच्या ह्या प्रवासातील पाहिलं ठिकाण म्हणजे त्या घरातील त्या खिडक्या. त्यातल्या एका खिडकीतून मी वाडीतल्या नारळ,सुपारीच्या बागा खूप पहिल्यात. मुळात दुपारी मी कधी झोपतच नाही आणि शाळेतल्या परीक्षाजवळ आल्या कि आई दुपारी अभ्यासाला बसवायची त्यावेळी मी असाच खिडकीवर बसून अभ्यास करत असे म्हणजे खिडकीतून बाहेर बघण्याचा अभ्यास चालू असे.
खड़तर हा मार्ग कधीचा अजूनही मी चालत आहे...
पाय जरी हे रक्ताळलेले वाट सर करत आहे...
दुखावलेले पाय बरे तरी होतील...
पण दुखावलेले इवलेसे मन कसे बरे होईल ???
कधी वाटे जीवनाचा प्रवास आता थांबवावा..
तोडून सारे बंधपाश मुक्त मी व्हावे...
पण प्रवास थांबवणे मज आता शक्य नाही....
सोनूली माझ्या कडेवर ही सुंदर प्रवासाचे स्वप्न पाही...
" विश्वास " हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे ईश्वरी शक्तींचा स्तोत आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही.
खूप काही अनाउन्समेंट कानावर पडतायत...
त्यात फेरीवाल्यांचे आवाज वेगळेच...
ट्रेनचा डबा तसा फारसा भरला नाहीये पण नजरेला कोणी भावत नाहीये ...खिडकीतून पाऊस दिसतोय .. ofcourse मला विंडो सिट यासाठी तर आवडते ...खूप दिवसांनी गावाला जातेय ..एक्साईटमेंट होती ..पण आता कमी होत चालली आहे कारण ट्रेन अर्धा तास झाला आहे तिथेच आहे ....
स्टेशन फारसं ओळखीचं नाहीये म्हणून खिडकीतून जमेल तेवढा जमेल तसा पाऊस जमा करतेय मग तो ओंजळीतून निसटताना चा असो की डोळ्यात भरून घेतानाचा ....
घडी बघून बघून डोळे थकले होते .. त्याचे काटे पुढे सरकत होते पण माझी ट्रेन नाही...
तेवढ्यात....
दुसर्या एका धाग्यावर विषय निघाला तेव्हा या विषयावर अनेक सुंदर व्हिडिओज, टिव्ही शोज वगैरे आहेत हे लक्षात आलं. या सगळ्यांची इथे नोंद करू.
भारत अथवा भारताबाहेरील विविध प्रेक्षणीय स्थळं, किल्ले, समुद्रकिनारे, प्राचीन शहरं, आधुनिक आणि नेहमीची लाडकी शहरं, म्युझियम्स, नद्या, जंगलं, हॉटेल्स, हटके ठिकाणं आणि हॉटेल्स ...... सर्व काही येऊ द्या.
सध्या काही काळापुरती तरी भटकंती फार फार मर्यादित असेल तर आपण घरीच बसून नेत्रसुख घेऊयात.
कमानीजवळ आम्हाला एक घर दिसले आणि चहाच्या आशेने आम्ही तिथे गेलो...
आता पुढे...
जाण्याच्या आधीच आम्ही भाऊश्याला "तिथं काहीच बोलू नकोस" असा दम भरला.
घराच्या बाहेरच एक व्यक्ती दिसली.
त्या व्यक्तीने आम्हाला हसतमुखाने "या भैय्या या " असं म्हणून बसायला खुर्च्या टाकल्या.
आधी पाणी देऊन,"नाश्ता करणार का जेवण?" असं आपुलकीने त्याने आम्हाला विचारले.जेवण करण्याचे आता कोणाचेच मन नव्हते.
"आम्हाला चहा मिळेल का ४ कप ?",असं विचारल्यावर "अक्के चहा टाक गं ४ कप " असा बाहेरूनच बोलून तो आमच्या शेजारी बसला.
धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!
सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!