चंद्रदेवाने त्याची ताऱ्यांची सभा आकाशात मांडली आणि महाल दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. महाराजांचा रथ पोचला आणि दास-दासी लगबगीने आरती आणि गुलाब पुष्प घेऊन आले. आरतीने महाराजांचा त्यांच्या भावी पत्नीसोबत प्रवेश झाला. महाराज्यांच्या नावाचा जयघोष झाल्यावर भावी महाराणींचे नाव सर्वत्र घोषित करण्याकरिता दासांनी नावाची विचारणा महाराजांना केली. शंतनूने क्षणभर चकित होऊन सुंदरीकडे पाहिले. जिला जीवनसंगिनी बनवायचे, तिचे नावही त्याने विचारले नव्हते. दिलेले वचन तत्परतेने पाळत होता की तिचा परिचय त्याला तिच्या नेत्रांतून मिळाला होता.... कोण जाणे!
पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे?
हस्तिनापुरात आनंद वार्ता पसरली. सम्राट प्रतिप यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. पुरुवंशाचा दिपक! बाळाला हातात घेउन सम्राटनी प्रेमाने त्याच्या तेजस्वी मुखकमलावरून हात फिरवला. "शंतनू....!" त्यांच्या मुखातून नाव बाहेर पडताच सर्वांनी युवराज शंतनू च्या नावाने जयघोष सुरु केला. ढोल-नगारे वाजवत जल्लोषाचे ध्वनी हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरले.
वशिष्ठ मुनींच्या आश्रमात एकच गोंधळ माजला होता. त्यांची आवडती गाय नंदिनी नेहमीच्या स्थानी दिसत नसल्याने ऋषीमुनी हैराण झाले होते. रानात, डोंगरावर, नदीकाठी, झाडाजवळ, सर्वत्र परिचित ठिकाणी शोधणे व्यर्थ ठरले. नंदीनी कुठेच नव्हती. वशिष्ठ ऋषींच्या मनात कोलाहल माजला. शेवटी ते ध्यान लाऊन बसले. आपली दिव्य-दृष्टी जागी करत त्यांनी नंदिनीला शोधायला सुरवात केली... क्षणातच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नंदिनी हरवली नव्हतीच! वशिष्ठ ऋषींच गोधन खुद्द प्रभास नामक एका वसूनेच पळवून नेलं होतं. एव्हडच नव्हे!
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा!
युगांतर- आरंभ अंताचा!
प्रस्तुत लेखन कोणे एकेकाळी सोमरसाच्या अतिशुद्ध मुग्धतेत रातराणीच्या सुगंधासारखे अवचित अवतरलेले, फार किस पाडू नये. 
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:
आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.
महाभारत
द्यूताचा विखरे विखार निजल्या कित्येक अक्षौहिणी
दु:खाच्या लिपिची महान रचना मी सोसली उन्मनी
काळोखातच चांदणे अवतरे काळ्या उतारांवर
रात्रीचा कमनीय प्रस्तर जुन्या मूर्तीप्रमाणे स्थिर
पाषाणातच युद्धभू हरपली संग्राम शिल्पातला
पाषाणातून मंद सूर झिरपे पाताळगर्भातला
पाषाणाभवती सतृष्ण शतके घनगर्द ओथंबती
पाषाणास फुटून पाझर कृपा वाहेल ओसंडती
स्टार प्लस वर सध्या चालू असलेली महाभारत मालिका खूप चर्चेत आहे म्हणूनच मी हा धागा उघडत आहे.
इथे आपण मालिका कशी वाटते, बद्दल चे तुमचे मत, त्यातील कलाकार इत्यादी वरती गप्पा मारू शकतो.