महाभारत

युगांतर - आरंभ अंताचा भाग 39

Submitted by मी मधुरा on 29 August, 2019 - 08:38

गडद निळ्या रंगाने सजून कृष्णमय झालेल्या पहाटेने सृष्टीला हलका दवांचा मारा करत जागे केले. पक्षांची किलबिल सुरू झाली तशी साऱ्या नगराला जाग आली. द्वारकेच्या महालातील कृष्णाचा कक्ष कर्णमधुर सुरांनी व्यापलेला होता.

पूर्वेचे सुर्यकिरण कक्षभर पसरतील अश्या विशाल खिडकीत निळा-जांभळा मयुर पिसारा फुलवून बासरी ऐकत होता. पहाटेच्या गारव्याने थरथरणारा फुललेला पिसारा ! कृष्ण डोळे मिटून बासरी वाजवण्यात मग्न होता. आज त्याचे सूर काही वेगळेच होते.

"अनुज!"
कृष्णाने डोळे उघडत बासरी बाजूला केली.

"दाऊ? काय झालं?" बलरामाच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत कृष्णाने विचारलं.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३८

Submitted by मी मधुरा on 26 August, 2019 - 08:21

"मला हे पटत नाही युवराज!"
"का?"
"हे एका योद्ध्याचे काम नव्हे."
"ते मला माहित नाही. मला इतकंच महत्त्वाचं वाटतं की राजमुगुट त्या पंडुपुत्रांच्या माथी नसला पाहिजे.वारणावतला तुमच्यासाठी महाल बनवलाय म्हणल्यावर बघ कसे सगळे पांडव गेले तिकडे. हावरट कुठले.
"युवराज, त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर. तुम्ही दिलेली भेट म्हणून संशय सुद्धा न घेता गेले ते तिथे. आणि राजगादीचाच प्रश्न आहे, तर त्यासाठी त्यांच्या बळी कशासाठी? तुम्ही द्वंद्वयुद्धाचे आव्हान द्या युधिष्ठिराला. तुमच्यावतीने मी त्याला पराजित करून त्याच्याच हस्ते तुमचा राज्याभिषेक करून देईन."

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३६

Submitted by मी मधुरा on 22 August, 2019 - 10:19

कुटीच्या दाराची हालचाल झाली. विदूरने आत प्रवेश केला तसे कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले.
"प्रणाम, आत येण्याची परवानगी आहे?"
"प्रणाम विदुर. आज तुम्ही या द्रोणाचार्याच्या कुटीत?" द्रोणांनी आश्चर्याने विचारले.
"मनात प्रश्न होते काही."
"तुम्हाला प्रश्न पडलेत, विदुर? खुद्द धर्मात्म्यास?"
"मनाला कश्याचे बंधन असते, गुरु द्रोण? एका निमिषात असंख्य प्रश्न पडतात त्याला. म्हणलं, निदान काही प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते बघावं."
द्रोणाचार्यांनी स्मित केले.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ३५

Submitted by मी मधुरा on 20 August, 2019 - 22:53

भरलेली सभा!
मान्यवर आसनस्थ होते.
द्रोणाचार्य उठले तेव्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. स्पर्धा काय असेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
"ही स्पर्धा समजा अथवा गुरु आज्ञा, पण माझ्यासाठी ही गुरुदक्षिणा असेल!" मुठीत धरून सगळे ऐकत होते.... "तुम्हाला पांचाल नरेश द्रुपद राजाला हरवून त्याला बंदी बनवायचे आहे."
दुर्योधनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. 'राजाला हरवायचे आहे? .....आणि हे पांडव स्पर्धा जिंकतील ? हे पाच जण?' त्याला हसू आले. 'ही गुरुदक्षिणा तर आम्हीच देणार तुम्हाला, गुरु द्रोण! १०० कौरव आणि हस्तिनापुरच्या सैन्यापुढे कोणीही टिकू शकत नाही!'

विषय: 

युगांतर- आरंभ अंताचा! भाग ३४

Submitted by मी मधुरा on 19 August, 2019 - 09:22

"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.

विषय: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग ३३

Submitted by मी मधुरा on 17 August, 2019 - 05:37

"आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.
"जितका तुम्हाला आवाज अनोळखी आहे, तितकाच अपरिचित आहे तो तरुण मला, महाराज."
"मला सांग विदुर, कसा दिसतो तो?"
"अलौकिक! सुवर्ण घातले आहे त्याने, महाराज कानांत.....आणि अंगावरचा पोषाखही पूर्ण सुवर्ण आहे."

विषय: 

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३१

Submitted by मी मधुरा on 15 August, 2019 - 10:08

आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....

ते ना महालात बदलले ना गुरुकुलात!

विषय: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग ३०

Submitted by मी मधुरा on 14 August, 2019 - 09:17

भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता. तेही सैनिकांच्या पहाऱ्यात.
"महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला."
"दंश केल्यावर शुद्धीत आला?"
"हो, महाराज."
"याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते."
"नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला.
'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?"
"मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र."
"कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?"
"हो."

विषय: 

Pages

Subscribe to RSS - महाभारत