बोलावते गाव फिरुनी
पैसे चार कमवाया, या शहरात आलो मी
सांडले गाव मागे अन, गर्दीत विरलो मी
सरले निवांत जगणे , इथे कसा रमलो मी ?
घेऊनी नवा चेहरा हा,माझ्यातला हरवलो मी
गर्दीत कुणा माणसाला, पुसले कुशल कधी मी
तुसडा कटाक्ष बोलला, अनोळखी गावंढळ मी
साहून हेटाळणी अशी, नकळत बदललो मी
गंधहीन कागदी फुलात रानफुल हरवलो मी
या वाकड्या नळाच्या, पाण्याची रितच न्यारी
सारीच माणसे वाकडी, समीकरण मांडतो मी
अन् देवासही चारित्र्य दाखला मागतो मी
विक्षिप्त वागणे माझे, त्याचा गर्व करितो मी