"खोल खोल आतवर तुझी नजर" या तरहीसाठी माझा सहभाग -
खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर
आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!
विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)
आठवांत राहती जुन्या व्यथा
सांग मग पडेल का तुझा विसर?
चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर
तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर
- नचिकेत जोशी
मी एक बातमी वाचली ज्यात लिहिले आहे की दिल्ली नंतर बंगलोर आणि मग मुंबई भारतातील असुरक्षित शहरे आहेत. भारतात तुम्हाला कुठल्या शहराचा कुठला वाईट अनुभव आला त्याबद्दल इथे चर्चा अपेक्षित आहे. चांगला अनुभव आला असेल तर तेही लिहा जेणेकरुन लोकांचे समज गैरसमज टळतील.
एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट
प्रयत्नांचे सिग्नल तोडत
नशीबाला साथीला घेत
धूळभरल्या हवेत
अश्रू झालेत चिकार
एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट
एका सुजलेल्या शहरात
फ्ल्यायओव्हरचं काम
मूठभर कारवाल्यांसाठी
आयुष्याचं दाम
पिलर एखादा तुटू दे
इन्शुरन्स क्लेम मिळू दे
पांढर्याशुभ्र झब्ब्याखाली
फक्त मन नसू दे भिकार
एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट
परफ्यूम शिंपडून निघालो
घामाचा झाकायला वास
फुटलाच कुठे बॉम्ब तर
रक्ताचं करू काय