तत्त्वज्ञान

उपनिषदांचा अभ्यास - भाग २

Submitted by पुरंदरे शशांक on 23 February, 2015 - 01:31

उपनिषदांचा अभ्यास - भाग २

उपनिषदे - सहा दर्शनांपैकी (षड्दर्शन) एक दर्शन. उपनिषदे म्हणजेच वेदांत किंवा उत्तरमीमांसा किंवा श्रुती. वेद-वाङ्मयातील शेवटचा भाग म्हणून याला वेदांत असे म्हटले जाते.
'आरण्यक' म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचे किंवा वेदभागाचे पठण करावयाचे तो भाग. मुळात उपनिषदे हीच आरण्यके होत. अनेक प्राचीन उपनिषदे वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकावयाची अध्यात्मविद्या. उपनिषदाचा हा व्युत्पत्यर्थ असला, तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. (मराठी विश्वकोश)

तुकोबांची कीर्तनभक्ति - सत्संगती - भाग १

Submitted by पुरंदरे शशांक on 16 February, 2015 - 06:08

तुकोबांची कीर्तनभक्ति - सत्संगती - भाग १

युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥९६||
(वेव्हार=व्यवहार., वनांतर=वनात जाऊन रहाणे., वाव=व्यर्थ)

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ||

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास .......

Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2015 - 22:01

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास .......

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥९८१||

त्यागपूर्वक भोग घ्यावा…….

Submitted by राधोदय on 23 January, 2015 - 08:25

श्री दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषदाचं भाषांतराचं कार्य सुरु केलं होतं. आणि पहिल्याचं श्लोकापाशी ते अडले….
ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगतI
तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विव्दनम II
अर्थात- या चराचरात जे म्हणून काही आहेपणानं दिसतं, भासतं, जाणवतं ते सारं ईश्वरानं व्यापलेलं आहे. त्या सर्वाचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नये.

विचार माझे

Submitted by सुमुक्ता on 23 January, 2015 - 05:51

कधी स्वच्छंद नदीसारखे
कधी गंभीर डोहासारखे

कधी पारदर्शी निर्झरासारखे
कधी अथांग सागरासारखे

कधी नवीन पालवीसारखे
कधी शिशिरातील वृक्षांसारखे

कधी तेजस्वी सूर्यासारखे
कधी मिट्ट काळोखासारखे

कधी वाळूच्या कणाएवढे
कधी अनंत आकाशाएवढे

कधी मायेची उब देणारे
कधी आधारस्तंभासारखे

कधी अगदी माझ्यासारखे
कधी मलाच परके करणारे

कधी मनात गर्दी करणारे
कधी मला एकटे सोडणारे

कधी शब्दांनी अलंकारिलेले
कधी निराकार जाणीवेसारखे

कधी होतील अर्पण समिधेसारखे
तादात्म्य ईश्वराशी पावणारे?

शब्दखुणा: 

उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १

Submitted by पुरंदरे शशांक on 18 January, 2015 - 21:58

उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १

"उपनिषदांचा महिमा अनेकांनी गाइला आहे. कवीने म्हटले आहे, हिमालयासारखा पर्वत नाही आणि उपनिषदांसारखे पुस्तक नाही. पण माझ्या दृष्टीने उपनिषद् हे पुस्तकच नाही. ते एक प्रातिभ दर्शन आहे. शब्दात मांडायचा प्रयत्न केला असला तरी शब्द लटपटले आहेत. पण निष्ठा मात्र उमटली आहे. ती निष्ठा ह्रदयात भरुन आणि शब्दांच्या सहाय्याने शब्द बाजूस सारुन अनुभव घ्यावा तेव्हाच उपनिषद् उमगते.

संक्रांत पर्वणी - तुकोबांच्या नजरेतून.

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2015 - 10:00

संक्रांत पर्वणी - तुकोबांच्या नजरेतून.

देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥ अभंगगाथा क्र. ४०५९||

(तिळी-तीळामधे, तिळाच्यारुपाने., धाला-आनंदला. , साधला-प्राप्त केला., पर्वकाळ-पर्वणी, पुण्य मिळवण्याची सुसंधी., अंतरींचा-मनातला, चित्तातला., मळ-दोष., खुंटले-संपले)

विवेकानंद विचारः विसंगती-सुसंगती

Submitted by आतिवास on 12 January, 2015 - 02:31

'विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.

थिरुवल्लुवर

Submitted by निमिष_सोनार on 9 January, 2015 - 03:51

मला हे "व्होट्स एप" वर मिळाले. खूप छान वाटले म्हणून शेअर केल्यावाचून रहावले गेले नाही.

कृपया..प्रत्येक पालकाने व शिक्षकाने हे वाचावे..

"थिरुवल्लुवर" ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामिळ संहिता आहे.. मानवी वर्तणुकीवरचे हे एवढे जुने शास्त्र, पण त्यातील तत्वे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही जशास तशी लागू होतात.

विचार करावा अशा काही बहुमोल गोष्टी ....

1. तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते याचा अर्थ त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर असते..

पिंपरीची बस, प्रेमशास्त्र आणि मै प्रेम की दीवानी हूं।

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 8 January, 2015 - 02:56

१. पिंपरीची बस - त्या काळी पुण्यात पीएमपीएमएल ऐवजी पिंपरी-चिंचवड (पीसीएमटी) व पुणे (पीएमटी) महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बस सेवा होत्या. कोणी कुठल्या भागात सेवा द्यायची याबद्दलचे काही नियम होते. पुणे महानगरपालिकेच्या पुणेस्टेशन परिसरात पीसीएमटी ला प्रवासी भरण्यास मुभा होती परंतु पुणे मनपा परिसरात येथे पीसीएमटीला परवानगी नव्हती. तसेच पीएमटीला निगडीच्या मुख्य चौकात तसेच पुढे जकातनाका, सोमाटणे फाटा, तळेगाव या भागापर्यंत प्रवासी वाहतुकीस परवानगी होती परंतु पिंपरी चिंचवड नवनगर (निगडी-प्राधिकरण), मासूळकर कॉलनी, पिंपरी गांव, वडगांव अशा काही भागांमध्ये पीएमटीला परवानगी नव्हती.

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान