संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री निळोबाराय
नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.
नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.
विपश्यना, या विषयावर अनेकदा हा आनंददायी अनुभव आहे, इतकच वाचल्या गेलं. पण एकदा तरी विपश्यना शिबिराला गेलं पाहिजे, असाही सल्ला बर्याच लोकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.
१. ह्या शिबिराला वेगवेगळ्या केंद्रात (उपकेंद्रात) काही फरक आहे का? असल्यास कोणता.
२. या शिबिरात शिकवल्या जाणार्या ध्यान-पद्धती बाहेर सांगू नये, असे वाचले होते, ते बरोबर आहे का? असल्यास त्याचे काय कारण असावे?
३. या शिबिरासाठी काही पुर्वतयारी असावी का? असल्यास कोणती ? उदा. काही विशेष कपडे, जसे योगासनांसाठी वापरतात तसे, वगैरे...
सर्व जगंच कसं नीट आखीव रेखीव आणि सुंदर होतं.
झोपडपट्ट्या नव्हत्या, गरीबी नव्हती. युद्ध नव्हती, कोणीही जन्मत: अधू किंवा अपंग नव्हतं. मनोरुग्णांचे कोंडवाडे नव्हते. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाने सर्वच रोगांवर विजय मिळवलेला. अगदी म्हातारपणावर देखील. अपघातांमुळे होणारे तुरळक मृत्यू सोडले तर “मरण” हे काही कर्मठ विचारसरणीच्या लोकांचा दुराग्रह होता.
गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!
ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....
अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोगः
ज्ञानेश्वरीत नवव्या अध्यायाला विशेष महत्व आहे. स्वतः माऊलींनीच त्याचे गुणगान गायले आहे. असे म्हणतात की जेव्हा माऊलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा नवव्या अध्याय म्हणत म्हणतच ते त्या पायर्या उतरत होते - इतका हा अध्याय त्यांच्या आवडीचा होता.
दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला या नवव्या अध्यायाचे महात्म्य सांगणार्या या गोड ओव्या पहा -
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ६ - एक वेगळा पैलू.
श्री ज्ञानेश्वर महाराज हे नक्की होते तरी कोण ?
योगी ? का भक्त ? का तत्वज्ञानी ? का कविश्रेष्ठ ? का विरक्त संत ? का ज्ञानराज ???
माझ्यामते तर ते या सगळ्या गोष्टी मिळून तयार झालेले आणि या सगळ्या विशेषणांच्याही पलिकडले एक अद्भुत रसायन होते .....
अमृतधारा - स्वामी स्वरूपानंद (पांवस)
आजारपण हे काही आपल्यापैकी कोणालाही नवीन नाही. कुणाकुणाची आजारपणे लिहून काढायची म्हटली तर प्रत्येकाचा एकेक ग्रंथ होईल इतकी विविधता अणि व्यापकता त्यात आहे.
पण याच आजारपणाचा उपयोग आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी कोणी करुन घेतल्याचे ना ऐकिवात आहे ना पहाण्यात आहे.
पांवसचे पूजनीय श्री स्वामी स्वरुपानंद यांनी हा अनुभव स्वतः घेतला व तो "अमृतधारा" या अगदी छोटेखानी पुस्तकात लिहून ठेवला. अतिशय सुरेख व प्रासादिक साकीवृत्तात हे सर्व त्यांनी लिहिले आहे. हे सगळे अनुभव म्हणजे एका साधकाचा सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास म्हणायलाही हरकत नाही.
श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ५
म्हणौनि सद्भाव जीवगत | बाहेरी दिसती फाकत | स्फटिकगृहींचे डोलत | दीपु जैसे ||४७६ अ. १३||
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् |
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ||अ. १३-७ ||
नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा । पावित्र्य गुरू-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम ॥ गीताई ॥
श्री ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग ४
तत्वज्ञ म्हणून माऊली एखादा विषय कसा सुरेख दृष्टांत, उपमा, उदाहरणे देऊन सांगतात ते पाहूया..
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ||४७-अ. १८||
उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ -गीताई॥
अगा आपुला हा स्वधर्मु| आचरणीं जरी विषमु|
तरी पाहावा तो परिणामु| फळेल जेणें ||९२३|| ...... (विषम = कठीण, अवघड, परिणाम=शेवटी)
अरे, आपला हा स्वधर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे मोक्षरुपी मोठे फळ प्राप्त होणार त्या परिणामावर लक्ष ठेवले पाहिजे.
आयुष्याच्या शेवटी चष्मा, मानेचा/कमरेचा पट्टा आणि शेवटी दातांची कवळी अशा विविध अवयवांसाठीच्या "कुबड्या" लावायची वेळ येते. या गोष्टी वरवर सारख्या दिसल्या तरी ज्याच्या त्यालाच फिट्ट बसतात आणि उपयोगी पडतात.