"ए आई, गोष्ट सांग ना!"
"बरं कोणती सांगू? इसापनीतीतली सांगू की बिरबलाची सांगू?"
"ऊऽम्म! नक्कोत त्या. तू मस्त पैकी छाऽऽन गोष्ट सांग. त्यात मी असेन, माझे सग्गळे मित्र मैत्रिणी असतील., परी असेल, फुलपाखरु असेल..." स्वप्नांच्या राज्यात हरवुन गेलेले दोन डोळे मला सांगत असतात.
आणि रोज रोज नविन नविन त्याही तिच्या अटी रुची मधे बसणार्या गोष्टी आणायच्या तरी कुठून ह्या प्रश्नाने मला घेरलेलं असतं.
वक्त- ’साठ’वण सिनेमांची
पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.
पाकिझा- साहेबजानचा प्रवास.
पाकिझा म्हणजे मीना कुमारी.
पाकिझा म्हणजे ते स्वप्न जे साकार करायला कमाल अमरोही चौदा वर्ष धडपडत होता.
पाकिझा म्हणजे अस्तंगत गेलेलं ते युग ज्यात काव्यात्मकता, तरलता, रोमॅन्टिसिझम आणि काही प्रमाणात भाबडीही वाटू शकणारी सामाजिकता हा सिनमांचा मुख्य गाभा होता.
पाकिझा म्हणजे लता मंगेशकर या गानसम्राज्ञीची अवीट गोडीची गाणी आणि गुलाम महंमद या दुर्लक्षित गुणी संगीतकाराचा अप्रतिम स्वरसाज.
पाकिझा म्हणजे तवायफ़-कलावंतिणींच्या बदनाम दुनियेचं करुण-राजस रुप.
पाकिझा म्हणजे मीना कुमारीच्या अभिनय कारकिर्दीला आणि तिच्या आयुष्यालाही मिळालेला पूर्णविराम.
भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.
मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.
काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.
प्रिय मित्रांनो,
म्हटलं तर गोष्ट तशी साधी आहे...
इंद्र सुखात्मेचा बारावीचा निकाल लागला आहे, आणि त्याला इंजीनियरिंगला प्रवेश घ्यायचा आहे.
लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न होतं, आपण इंजीनियर व्हायचं. पण त्याच्या अण्णांना, म्हणजे वडिलांना वाटतंय, मुलांनी आपल्याला मोठ्या खर्चात घालण्यापेक्षा थोडी वेगळी वाट घेऊन समाधानी व्हावं.
इंद्रला मार्क पडलेत ९०%. पण अॅडमिशन थांबली आहे ९१ टक्क्यांवर!
आईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे.
आमच्या ’हा भारत माझा’ या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली.
मायबोली.कॉमने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या 'मसाला' चित्रपटाचा प्रीमियर गुरूवार दिनांक १९ एप्रिल, २०१२ रोजी मुंबईत आणि शुक्रवार दिनांक २० एप्रिल, २०१२ रोजी पुण्यात पार पडला.
या प्रीमियरचे वृत्तांत, प्रकाशचित्रे आणि प्रतिक्रिया आपल्याला इथे वाचावयास मिळतील.
ज्यांना 24*7 विविध भारती online ऐकायचे असेल त्यांच्यासाठी –
www.voicevibes.net
Vividh Bharati - देश की सुरीली धड़कन - Live
Dear listeners, I am happy with the kind of response that you have given to the idea of streaming radio online. Thank you all for your love and support. The primary theme behind this idea is [ Feel Home ]. Hope you are feeling it.
For a better listening experience use Firefox or Chrome browser.
आज म्हणजे २७ मार्च २०१२ हा ५० वा जागतिक रंगभूमी दिन. १९६१ साली युनेस्को च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट ने जागतिक रंगभूमी दिनाची रूजवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा झाला. जगभर या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम होत असतात.
युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट तर्फे नाट्यजगतातील महत्वाच्या कुणी दिलेला संदेश हा एक दरवर्षीच्या कार्यक्रमांपैकी महत्वाचा भाग.
पहिल्या वर्षी म्हणजे १९६२ साली हा संदेश ज्याँ कॉक्चू यांनी दिला होता.
लोकेशन रे लोकेशन !
हिंदी सिनेमा मधली गाणी म्हणजे आवडीची गोष्ट एकदम . त्यातून ती ५०-६०-७० च्या दशकातली म्हणजे तर गाणे दहा वेळा बघितले असले तरी नजर जराही हटायला तयार होत नाही .
स्टुडीओच्याबाहेर चित्रण झालेली , काही गाणी बघताना एकदम जाणवले की अरे हे मागे दिसते आहे ते तर आपण पाहिलं आहे . आणि मग सुरु झाला एक वेडगळ छंद , ज्यात गाण्यापेक्षा, हिरो आणि हिरविणीपेक्षा, मागच्या इमारती , बागा वगैरे निरखून बघण्याचा .
अशीच काही नमुने दाखल गाणी तुमच्या साठी . आपल्या ओळखीच्या ऐतिहासिक स्थळा ची एक चक्कर घडवून आणणारी ..
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत
दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल
युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना