सगळीकडून मार खाल्ल्यावर शेवटचा रस्ता म्हणून काही जण लिखाणाकडं वळतात. जयंत समजा त्यांपैकीच एक.
तुम्ही म्हणाल जयंत? कोण जयंत? आणि कुणापैकी आहे हा ? आमच्यापैकी की त्यांच्यापैकी?? नीट सांगा जरा..! बसा..! पाणी वगैरे घेणार का ? नको ना? ठीकाय. बसा जरा... सगळं व्यवस्थित सांगा..!
तर नाही. तो कुणी नाही.
समाजाच्या काठाकाठानं फिरणारा माणूस. कुटुंब नाही. मित्र नाही. गर्लफ्रेंड नाही. इंटेन्स रिलेशनशिप्स नाहीत. नोकरीबद्दल लिहिण्याचा अश्लीलपणा त्याला पटत नाही. मग उरतं काय? एकट्या मनुष्याची कादंबरी ? त्यात कुणाला इंटरेस्ट असणार?? पण आता ती लिहिलीय त्यानं.
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
स्थित्यंतर
Change is hard at first,messy in the middle and glorius in the end!Robin Sharma
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
घासाघीस...… तसं पाहिलं तर हा अगदी सरळ, साधा अर्थ असलेला शब्द.... पण या एका शब्दात माझे दोन आगळेवेगळे छंद सामावले आहेत.
त्यातला एक छंद तर अगदी शब्दशः आहे... घासाघीस करणं... पण 'साराभाई vs साराभाई' मालिकेमधल्या माया साराभाईच्या शब्दांत सांगायचं तर. 'घासाघीस is just too middle class... say bargaining.'
ही गोष्ट आहे पारवे परिवारातल्या तीन पिढ्यांची...'पारवे' या आडनावा वरून थोडाफार अंदाज आलाच असेल तुम्हांला; पण तरीही स्पष्ट करते- हे पारवे कुटुंब म्हणजे आमच्या अपार्टमेंट मधे रहात असलेल्या कबुतरांच्या तीन पिढ्या! आता तीन पिढ्या म्हटल्या की त्या अनुषंगाने होणारे वैचारिक आणि कधीकधी शाब्दिक मतभेदही आलेच की... सुटसुटीत भाषेत ज्याला generation gap म्हणतात ना ; अगदी तेच!
शर्वरीसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. अगदी मनाच्या कुपीत जपून ठेवण्याइतका खास... फक्त तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या पतीच्या- रोहनच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकासाठी! आज रोहनला त्याची हक्काची ओळख मिळणार होती. तब्बल वीस वर्षांनंतर का होईना पण त्याची जीवनगाथा, त्याचं शौर्य आणि तिचा त्याग आज सगळ्या जगाला कळणार होता.
लग जा गले...
साधारण दीड एक वर्षापूर्वी, म्हणजे ऑक्टोबर २०२१ मधे माझ्या एका मैत्रिणीच्या प्रेमळ आग्रहाखातर मी 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' या अजरामर गाण्याबद्दल माझ्या मनातले विचार माझ्या लेखात नमूद केले होते.
तो लेख वाचल्यानंतर माझ्या काही वाचक मित्र मैत्रिणींनी मला वैयक्तिक फोन करून त्यांच्या आवडीची गाणी सांगून- 'त्यांवरही मी काहीतरी लिहावं'- अशी इच्छा प्रकट केली होती.
त्यावेळी काही अपरिहार्य कारणांमुळे मला ते शक्य झालं नाही, त्याबद्दल माझ्या सदर मित्र मैत्रिणींची अगदी मनापासून माफी मागते.