कोल्हापुर परगणा
विकेंडची एक्सप्रेस हायवेवरची गर्दी, पुढे सातारा कराड पेठ नाका सांगली वाडी कुरूंदवाड टाकळी मार्गे सायंकाळी खिद्रापुरात पोहचलो तेव्हा सुनिल आमची वाट पाहतच उभा होता. सुनिल आणि त्याच्या घरातल्या मंडळींनी जे काही आमचे आदारतिथ्य केले त्या बद्दल काय सांगू. असे म्हणतात मैत्रीत किंवा आपल्या माणसांमध्ये धन्यवाद आभारी वगैरे असल्या शब्दांना किंमत नसते. त्यामुळे असे काही शब्द वापरून मी त्यांच्या प्रेमाचे मोल कमी करणार नाही.
खिद्रापुरचे उत्कृष्ट शिल्पकलेचे प्राचीन शिवालय !
साधारण 3 ,साडे तीन महिन्यांपूर्वी तळबीड ला काही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळ होत आली होती. तिथे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची समाधी होती. तिथं दर्शन घेतलं. जरा वेळ बसलो तेव्हा एक ग्रामस्थांने चौकशी केली कुठून आला वगैरे आणि सांगितलं मागे वसंतगड आहे तो पण फिरून या. संध्याकाळचे पाच वाजत आलेले तरी जाऊन बघू म्हणून गावातल्या छोट्या अरुंद रस्त्याने पायथ्याशी पोचलो. वरून 5-6 जण उतरत येत होते , त्याना विचारलं अंदाजे किती वेळ लागेल सगळं फिरून बघायला तर दोन तास तरी लागतील म्हणले. परत केव्हातरी बघू म्हणून बेत कॅन्सल करून परतीच्या प्रवासाला लागलो होतो तो परत यायचा मुहूर्त शिवजयंती च्या दिवशी आला.
मुंबई परिसर भेट
मुंबई हे बंदर म्हणून ब्रिटिशांनी वाढवले आणि व्यापारी उलाढाल केंद्र म्हणून झाल्यावर लोक इथे येऊन राहू लागले. शैक्षणिक केंद्रही झाले. विविध सुंदर कार्यालय इमारती बांधल्या गेल्या . कापड गिरण्यांनी मध्यमुंबईत जागा व्यापल्या आणि तीस वर्षे जोरात होत्या. मनोरंजनासाठी सिनेमा,नाट्यगृह,बागा तयार झाल्या.
मुंबईत येण्याची कारणे विविध आहेत. धंदा,व्यापार,नोकरी. प्रवासाची अनेक साधने यासाठी तयार झाली आणि केंद्रबिंदू झाला.
_____________________________
मनोरंजनासाठी मुंबई भेट
वारसदार घाट, अनघाई घाट आणि अनघाई किल्ला.
✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात!
✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड
✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर!
✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन)
✪ सायकलिंगचे मानसिक पैलू
✪ भाषेचा अडथळा? हो आणि नाही.
✪ कल्याण कर्नाटक प्रदेश
✪ ५ दिवसांमध्ये ४३८ किमी पूर्ण
Fakemytrip by Mukund
म्हणजे (काही खरे काही खोटे)
वाट..की रस्ता
अगदी असाच वैताग आला होता मला..तुमच्यासारखाच. घरातून बाहेर पडलं की जो रस्ता आहे त्याच्या डावीकडे गेलो की पुढे एका देवळाजवळ तो संपतो.उजवीकडे गेलो तर स्टेशनकडे किंवा हायवेकडे असे पर्याय आहेत पण येऊन जाऊन कसेही जा..परत घराकडे याल. पुणे, नाशिक, सिल्वासा...त्याच दिशा..तेच रस्ते.. तीच वळणे.पार कंटाळा आला होता त्याच त्याच रस्त्याने पुन्हा पुन्हा जाऊन.अगदी चक्रात अडकल्यासारखे झाले होते.
असाच बाहेर पडलो आणि चक्क लोकलने माथेरान गाठले...आणि हा रस्ता "वाटेत" भेटला.
आमची अमेरिका वारी….. भाग 6
कॅलिफोर्निया..सीमि व्हॅली...
मुंबई नुसतं नाव ऐकलं तरी गजबजाट, गर्दी, सतत धावणारी माणसं, पळणाऱ्या ट्रेन्स आणि गाड्या असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं, आणि खरोखरच मुंबई अगदी तशीच आहे. सततची गर्दी असलेलं हे ७ बेटांनी बनलेलं शहर, भारताची आर्थिक राजधानी, सिमेंट काँक्रीटचं जंगल आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणारी लोकं हीच मुंबईची ओळख बनली आहे, पण ऐतिहासिक वारसा लाभलेली हीच मुंबई इतकी बघणीय असेल हे ऐकून बऱ्याच लोकांना नवल वाटतं. मुंबईच देखणेपण हे इथल्या गल्ल्या-बोळात फिरल्याशिवाय कळणं तसं अवघड!