बोरिवलीची ट्रेन पकडल्यामुळे आज सात नं. फलाटाऐवजी पाच नं.फलाटावर उतरावे लागले. उशीर तर झालाच होता. धावत पळत खांदे वाकडे, तिरपे करत कसाबसा (नेहमीच्याच) गर्दीतुन पार्ले पश्चिमेच्या आकाशमार्गावर आलो (Sky walk). थोडे अंतर चालतो न चालतोय तोच खिशातला मोबाईल चुळबुळ करु लागला. सुरवातीला वाटले नको उचलुया. ऑफिसमधुन असेल. नाहीतरी मी लेट झालो होतोच. पण नंतर सवयीप्रमाणे न रहावुन फोन बाहेर काढला. स्क्रीन वर अण्णांचा नंबर. तिथेच मनात शंकेची पाल चुक-चुकली. जराही उसंत न लावता मी फोन काणाला लावला.समोरुन अण्णांचा अपरिचित असा गहिवरलेला आवाज्."अरे...... दादा आई....गेली........!...तुझी आज्जी गेली.....!
वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. .
सवाल-जवाब F.I.R.
खालील कथेतील/लेखातील/उतार्यातील जे काही आहे त्यातील सार्या घटना आणि पात्रे काल्पनिक आहेत याची नोंद घ्यावी.
तरी वाचताना याचे भान नाही ठेवले तरी चालेल. कारण योगायोग सापडायला पुरेसा वाव आहे.
स्थळ - महानगरातील एक रेल्वे पोलिस स्टेशन.
वेळ - दुपारी बारा-साडेबाराची.
शहरात चांगले पाच दिवस उपचार घेऊनही काही फरक न पडल्यामुळे सदाला घेऊन दिनकरराव व श्यामराव परत गावाला आले. नि देवरुशी, भगत , मांत्रिक यांचे उंबरे झिजवू लागले. सगळ्यांनी आपापल्या परीने चांगला पैसा उकळला परंतु सदाला चांगला बरा कोणीच करू शकले नाही. पैसा जाऊनही पोरगं बरं झालं नाही म्हणून सदाचे चुलता व वडील दोघेही हताश झाले. त्यांना काय करावे ते समझेना.
वडील व चूलत्यानंतर सदाची काळजी वाटणारे होते ते म्हणजे सदाचे गावातील मित्र
भाऊ - १
--------------------------------------------------------------------------------------------------
साहेबांचे बोल महेशच्या कानात एकसारखे घुमत होते. "जगत नाही आता.... तोही आणि तूही!"
कोर्टकचेरी, पोलिस याच्याशी कधी संबंध येऊ नये म्हणतात. आज तर थेट गुन्हा दाखल होण्याची वेळ आली, काही चूक नसताना! जसजसा वेळ जाईल तसतसा महेशचा धीर सुटू लागला. डोकं विचारांनी भरून गेलं होतं, पण डोक्यात काहीच शिरत नव्हतं. सुन्न डोकं, आणि तो कर्कश्श आवाज.
दिवस मावळला, नि एक एक जण ती छोटी टेकडी चढून वर माथ्यावर यायला लागला. दिवसभराची कामं आटोपून सायंकाळच्या वेळेत मस्त गप्पा मारायच्या, हास्यविनोदात तास दीड तास घालवायचा असा ह्या मित्रमंडळींचा रोजचाच नियम. त्या नियमाला अनुसरूनच त्या छोट्या टेकडावर एक एक जण जमत होता.
(अश्मयुगातील गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
भाग १ : http://www.maayboli.com/node/33037
भाग २ : http://www.maayboli.com/node/33147 ( पुढे ... )
मग आम्ही सगळे टेकडी उतरू लागलो. हळूहळू उजेड होत होता. सूर्यदेव आकाशात आला. सगळीकडे चकचकीत उजेड झाला. आम्ही आता नदीच्या जवळ आलो. नदीत सगळ्यांनी स्वच्छ होऊन घेतलं. मला तर नदीत डुंबायला खुप मज्जा आली. मग बाहेर आलो.
(अश्मयुगातील गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
भाग १ : http://www.maayboli.com/node/33037 ( पुढे ... )
बाहेर सगळे बाबा थोडावेळ बोलले. मग तेही आले झोपायला.
माझे बाबा आले अन म्हणाले, " बरं का, मोठ्या बाबांनी सांगितलय; उद्यापासून रामलाही बाहेर घेऊन जायचय. तो आता मोठा होतोय. जंगलचे कायदे त्याने शिकायला हवेत. "
आई काळजी करत म्हणाली, " अहो, अजून लहानच आहे तो. इतक्यात कशाला? "
गावापासून थोड्याच अंतरावर डोंगरांची रांग होती. काही खडकाळ भाग सोडला तर बहुतेक भाग जंगलाने व्यापला होता.गावातले लोक सहसा घनदाट जंगलाच्या बाजूला जात नसत. जंगलाच्या ठराविक भागातच वावर असे. घनदाट भागात जायचं झाले तर चार दोन जण बरोबर असल्याशिवाय कोणी धाडस करीत नसे.
(अश्मयुगातल्या रामची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
रात्र झाली होती. आमची सर्वांची जेवणं झाली अन मग सगळे बाबांच्याभोवती जमले.
मुलं ओरडू लागली, "गोष्ट गोष्ट ! आज जंगलात काय काय झालं, त्याची गोष्ट ! "
मोठे बाबा हात वर करत म्हणाले, " अरे हो हो ! पण आधी सगळे शांत बसा बरं. आज रामचे बाबा गोष्ट सांगतील."
मी खुष झालो. आज माझे बाबा गोष्ट सांगणार !
सगळी मुलं गप्प बसून ऐकू लागली. छोटी मुलं आपापल्या आयांच्या मांडित जाऊन बसली.