बस्तर दशहरा
मध्य भारतातला एक प्रमुख सण आणि जगातील सर्वात जास्त दिवस सातत्याने चालणारा उत्सव म्हणजे बस्तरचा दसरा उत्सव उर्फ 'बस्तर दशहरा'. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये साजरा होणाऱ्या दसरा उत्सव म्हणजे शक्तीचा जागर. बस्तरच्या कुलदेवीची 'आई दंतेश्वरीची' शक्तीस्वरूपात पूजा केली जाते. पारंपारिक रीतिरिवाजानुसार आणि अनोख्या शैलीत साजरा होत असल्याने, देशातील इतर ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या दसरा उत्सवापेक्षा हा उत्सव अनोखा आहे.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
आणि तो वैतागला.
"अगं ती फुलांची पिशवी हातात घेऊन काय करते आहेस?"
ती काही बोलणार इतक्यात त्याने ती फुलं परातीत ओतून चुरून टाकली. तेवढ्यात एक डोळा दरवाज्याकडे ठेवत ती स्टूल घेऊन आली. तो परात वर धरून उभा राहिला. तिनं पाकळ्या पंख्याच्या पात्यांवर पसरून टाकल्या. विजेच्या वेगाने पुढील हालचाली करत उतरून स्टूल जागेवर ठेवलं, दिवे मालवले आणि बाकीच्या लोकांप्रमाणे सोफ्यामागे जाऊन लपून बसली.
हांगचौमध्ये आपलं स्वागत!

हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक
काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
ज्या गावात बालपण, तरूणपणाचा जास्तीत जास्त काळ गेला, त्याच्याशी खास आठवणी निगडीत असतात. काही कारणाने गाव सोडून जावे लागले तरी त्या गावाचे आपल्या जीवनातील स्थान कधीच ढळत नाही. अशी खास गावे जन्मगाव किंवा भावकी / गावकी असलेलीच असतील असे नाही. आमचे गाव दुष्काळी असल्याने मागच्या कुठल्यातरी पिढीत जवळच्या पाण्याशेजारी गावच्या गाव स्थलांतरीत झाले. पुढे शहरातल्या संधी बघून दोन तीन पिढ्यांच्या मागे आम्ही पुण्यात येऊन स्थायिक झालो. पुण्यातही आधी रामवाडीच्या पुढे, मग थोडे सरकत कल्याणीनगर आणि आता मध्यवर्ती ठिकाण ते नवे वास्तव्य वारजेच्या अलिकडे.
पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल.
आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.