काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
ज्या गावात बालपण, तरूणपणाचा जास्तीत जास्त काळ गेला, त्याच्याशी खास आठवणी निगडीत असतात. काही कारणाने गाव सोडून जावे लागले तरी त्या गावाचे आपल्या जीवनातील स्थान कधीच ढळत नाही. अशी खास गावे जन्मगाव किंवा भावकी / गावकी असलेलीच असतील असे नाही. आमचे गाव दुष्काळी असल्याने मागच्या कुठल्यातरी पिढीत जवळच्या पाण्याशेजारी गावच्या गाव स्थलांतरीत झाले. पुढे शहरातल्या संधी बघून दोन तीन पिढ्यांच्या मागे आम्ही पुण्यात येऊन स्थायिक झालो. पुण्यातही आधी रामवाडीच्या पुढे, मग थोडे सरकत कल्याणीनगर आणि आता मध्यवर्ती ठिकाण ते नवे वास्तव्य वारजेच्या अलिकडे.
पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल.
आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.
पुणे तिथे काय उणे !
पुण्यातली मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण ठरतेय. कारण पुणे मेट्रोची स्टेशन्स एकाहून एक अभिनव आहेत. सर्वत गजतेय ते डेक्कन चं पगडीच्या आकाराचं स्टेशन. सिव्हिल कोर्ट हे भारतातले सर्वत खोल असे भुयारी स्टेशन ठरले आहे. शिवाजीनगर स्टेशन सुद्धा भुयारी आहे. खाली उतरल्यावर आपल्याला शनिवारवाड्याची थीम दिसते. याचं सर्वत्र कौतुक होतंय. हे स्टेशन बघायला रोज पर्यटक येत आहेत. दापोडीच्या रेल्वे स्टेशनचा आकार सुद्धा नावीन्यपूर्ण आहे.
डेक्कन स्टेशन
सिने सॄष्टी किंवा ईतरही मोठ्या क्षेत्रातील ज्याचे जवळ अमाप पैसा, सुख सोई आहे अशा व्यक्ती आत्महत्या करीत आहेत. आजच वाचनात आलेली नितीन देसाई ह्यांची आत्महत्ते बाबतची बातमी ऐकूण प्रश्न पडतो की जगात सुसंवाद हरवत चालला आहे का? लोक मोबाईल, नोकरी व्यापात गुंतल्याने एकमेकांच्या भेटीतून सुटू शकणारे प्रश्न आज कोणीच कोणाला सांगत नसल्याने असे घडत आहे, का? एवढे टोकाचे पाऊल उचलण्या आधी काहीच विचार का नाही करत.
आज शेवटचां दिवस, हो नाही करता करता रात्री अकराला ठरवले, कसही करुन उद्या जायचच.
सकाळी सातला रिव्हरव्ह्यू पार्कला पोहोचले. अपेक्षेप्रमाणे तिकडे मेळा जमला होता. लांबूनच दिसणारे उंचावलेले भगवे, साड्या, पंजाबी ड्रेस, पांढरे-भगवे कुडते आदी पारंपरिक पोषाखातील बायामाणसे, झांजांची किणकिण, आसमंतात पसरलेला उत्साह लगेच तुम्हाला आपल्यात सामावून घेत होता. त्यातच स्वागताला लावलेल्या चंदनाच्या टिक्याने पुढील ३-४ तासांची नांदीच मिळाली.
संध्याकाळी बराच उशीर झालेला, चालून चालून पायाचे तुकडे पडलेले, आणि भुकेने पोटात खड्डा. तीनेक तास तरी आम्ही IKEA तल्या तीन एक मजल्यांवर पसरलेल्या लिविंग रूम , बेडरूम, किचन , चिल्ड्रेन’स रूम मधलं सामान , शोभेच्या वस्तू, झाडं, कुंड्या , झालच तर कचऱ्यांच्या पिशव्या ठेवायचा प्लास्टिकचा डिस्पेन्सर सगळं भारी कौतुकाने बघत, काय घ्यायचं त्याच्या नोंदी करत फिरत होतो. चेक आउट कॉउंटरच्या पलीकडे कुठेतरी बहुदा कॅन्टीन होत. आम्ही त्या लांबलचक लायनीतून एकदाचे (कसेबसे) काउंटरच्या पलीकडे आलो आणि तडक फूड कॉउंटर गाठला. तिकडे वेगवेगळॆ पदार्थ, ब्रेड्स, सॅलड्स अतिशय आकर्षकरित्या मांडलेले.