यावर्षी सारेगमप लिटल चॅम्प्स् मराठी पुन्हा येत आहे.
याची जाहिरात गेले काही आठवड्यांपासून येत आहे त्यामुळे उत्सुकता ताणली होती/आहे. पण नुकतेच कळले की यावेळी परिक्षक नसून ज्युरी असणार आणि ते ज्युरी म्हणजे आधीच्या लिल-चँपमधले अंतिम पाच स्पर्धक आहेत. एकही एलिमिनेशन नसणार. ही वरची नवीन माहिती मिळाल्यावर थोडी धाकधूक वाटली की या फॉरमॅटमुळे कार्यक्रम रंगेल का?
कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी हा धागा.
इरॉटिका आणि पॉर्न यांच्यात फरक काय असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर फार कठीण आहे असे नाही. पॉर्न (अश्लील) साहित्य, गाणी, प्रतिमा किंवा चित्रपट म्हणजे स्त्री आणि पुरूष यांच्या शारीरिक जवळीकीचा संपूर्ण देखावा. स्त्री आणि पुरुषाच्या समागमाचे मादी आणि नरात झालेल्या संभोगाचे हीन रूपांतर, ज्यात आपल्या जोडीदाराबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम, भावना किंवा अगदी खोलवर वाटणारी काळजी याचा संपूर्ण अभाव असून केवळ प्राणीजन्य मैथुनाचा तो एक भाग होऊन जातो. यात भाग घेणारे सर्व स्त्री पुरूष एका विवक्षित क्षणी अपमानित केले जातात, खास करून स्त्री पात्राला तर अगदी नेहमी तसे केले जाते.
बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) 'राजविद्याराजगुह्ययोग' असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत - लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली!
मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥
प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन....
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या ’नायिका महाभारताच्या’ नावाच्या एका व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याची संधी मला नुकतीच मिळाली. ही व्याख्यानमाला अर्थातच ऑनलाईन होती. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं या मालेत होती. तीन शनिवार-रविवारच्या सकाळी अशा प्रकारे सत्कारणी लागल्या. या व्याख्यानमालेविषयी थोडं लिहावंसं वाटलं.
भगवद्गीता - अध्याय आठवा - अक्षरब्रह्मयोग
दुसरा मुलगा मला आता तीन वर्षांपूर्वी झाला. पण त्या आधी चार वर्षे एकच मुलगी होती. बरेपैकी लाडावलेली होती. आय मीन आहे. कारण पहिली मुलगी व्हावी अशी मुळातच बरीच ईच्छा होती. ते एक असो, पण त्यामुळे मुलीशी नाते अगदी मैत्रीचे आहे. लहानपणी ती आधी मला नावाने हाक मारायची ते गोड वाटायचे. पुढे पप्पा बोलू लागली ते ही आवडू लागले. पण अहो जाहो नाही तर अरे तुरे, म्हणजे एकेरीच उल्लेख करू लागली ते ही छान वाटू लागले.
ज्ञानविज्ञानयोग
पाप पुण्य की शंका नाही, स्वर्ग-नर्क नही जाही।।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।।
If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power, and beauty that nature can bestow—in some parts a very paradise on earth—I should point to India. If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant—I should point to India.