माझा सुट्टीचा दिवस होता. सकाळच्या दूरच्या रपेटीनंतर भरपेट जेवण झालेलं. डोळ्यावर झोप अनावर झालेली. मी आडवा होणार तोच बायको उत्साहात कुठला तरी फोटो मोबाईलमध्ये दाखवत आली.
"काल मी गाडगीळांकडे गेले होते ना तिथे मला परफेक्ट कानातलं मिळालं आहे. माझ्या हिऱ्यांच्या पेंडंटला परफेक्ट मॅचिंग आहे."
कित्येक वर्षानी या एरियात आलोच आहोत तर सहज नजर टाकू या, म्हणून ती कॉलेजशी डोकावली.
पूर्ण एरिया सारखीच कॉलेजनेही कात टाकली होती. दोन मजल्यांची साधीशी बैठी इमारत जावून कित्येक मजली उंच चकाचक टोलेजंग लिफ्टवांली इमारत झाली होती, आण्टीचा चहाचा stall, वडापावची गाडी काहीच ओळखीचं दिसत नव्हतं.. अपवाद फक्त ..
एकमेव तो बहरलेला गुलमोहोर आणि त्याखाली तसाच, तिथेच असलेला तो बाक.
हळूच हसत त्या बाकावर हलकेच टेकेपर्यंत मन विजेच्या वेगाने गेलं होत पार २५ वर्ष मागे..
उपसुंद आठवतोय?! त्याच्या प्राॅडक्टचा वार्षिक रिलीज होता.
हो, हा प्री-क्लाऊड काळ होता. तेंव्हा असायचे असे ठरवून केलेले रिलीजेस. आणि आमच्यासारख्या एंटरप्राइज प्राॅडक्टचे तर नक्कीच असायचे.
तसे अजून दोन महिने होते त्याला. पण सगळे कस्टमर नव्या व्हर्जनवर आणायचे तर व्यवस्थित प्लॅनिंग लागायचं. (बोअर मारतोय? साॅरी.)
अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
(संदर्भ - मायबोलीवरील चर्चा. (शोधा पुन्हा कधीतरी))
आज माझे आजोबा जिवंत असते तर तब्बल १२० वर्षांचे असते. त्यांचे बालपण मुंबईतच गेले. थोडक्यात मुंबईकर म्हणून आमचा किमान शंभर वर्षांचा ईतिहास आहे असे म्हणू शकतो 
एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिच्या स्पंदने अंतरीची कळावी
मनाचा मनाशी संवाद व्हावा, हृदयातली तार तेथे जुळावी
एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिला भेटता दुःख सारे सरावे
निसर्गा वसंती जसा गंध येतो, तसे चित्त उत्फुल्ल अलवार व्हावे
एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिची ओढ काळास व्यापून टाके
जिला भेटण्याने तमाच्या जिव्हारी, प्रभा लालिम्याची क्षणार्धात फाके
एक व्यक्ती अशी भेटली पाहिजे, जिने फक्त देताच आधार थोडा
संपून जाईल आकांत सारा, विसावा सुखे जीव घेईल वेडा