भाग - १
ते स्वप्न पडल्यापासून गेले दोन तीन दिवस जरा घाबरलो होतो. चूपचाप शाळा, अभ्यास, ट्युशन, जेवण शेड्युल गोल गोल सुरू होतं. आताही त्या पिवळ्या बंगल्यासमोरून जात होतो पण आत बघायचा धीर होत नव्हता. पण.. गेल्या दोन तीन दिवसांपासून तिकडे जाण्याची मनाला ओढ लागली आहे. तिथे कुणाला तरी माझी गरज आहे असं सारखं वाटतंय. तिथली झाडं, वाऱ्यावर झुलणाऱ्या डहाळ्या, उडणारी पानं या सगळ्यात काहीतरी एक रहस्य नक्की लपलेलं आहे..
स्थळ-इस्लामपूर
दिनांक-१२-०२-२०१७
"हा मी इस्लामपूर कुरियर डेपो मधून बोलतोय,तुम्ही मिस.साठे ना ? हा तुमचं कुरियर आलंय तेवढं घेऊन जा....
हो स्टॅन्डजवळ आहे ऑफिस,हो आहे मी, या दिवसभरात"
"हो निघतीये मी,येता येता कुरियरपण घेऊन येईन,
हो मगाशी आलेला फोन मला कुरियरवल्याचा आणि तू जेवून घे हा,एकदा काम सुरु झालं कि भान राहत नाही तुला.
असूदेत,काळजी आहे म्हणून सांगतीये दहा वेळा.
हो मोपेड घेऊन जातीये..
आता मला कसं कळणार काय आहे कुरियर ते ? बघितल्यावर करते कि फोन.
बरं ठेवतीये मी आता आवरायचंय मलापण ....तू जेवून...ठेवलापण यान फोन"
त्या दिवशी अंधारून आले होते. भर दुपार असुनही काळोख दाटला होता. वारा सुटला होता. खिडक्यांची तावदान एकमेकांवर आपटून आवाज होत होता. भरीस भर म्हणून झाडांच्या पानांची सळसळ चालूच होती!!
साधारणपणे रात्रीचे ११ वाजलेले असावेत. गार हवा सुटलेली होती. त्यात या दुमजली इमारतीचं बांधकामही दगडी होत. आजूबाजूला अगदी निरव शांतता होती . आज अमावस्या वगैरे नव्हती पण आकाशात त्यामानानं चांदणं तसं कमीच होत किंवा मला तरी तसं जाणवत होत. मी इथं आत्ता एकटाच होतो.मला कुणीतरी येण्याची चाहूल लागली,पण तिकडं लक्ष न देता मी तिथंच खिडकीत उभा होतो.ती खिडकी लाकडी होती आणि खूप जुनी होती.
: मला आलेला एक थरारक अनुभव:
कॉलेज संपवून जॉबच्या शोधार्थ बाहेर पडलो. शोधाशोध केल्यानंतर अखेरीस दोन तीन महीन्याने गोव्याला जॉब मिळाला. सगळे सामान घेऊन गोव्याला (मडगांव) आलो. कंपनीतील ओळखीने शहराच्या मद्यवर्ती ठिकाणी एका अपार्टमेंट मध्ये रूम मिळाली. गोव्यातील अपार्टमेंट सहसा सुनसानच असतात. दिवसा देखील तुम्हाला बिल्डींग मध्ये जास्तीत जास्त एक नाहीतर दोन माणसे दिसतील. मी जॉब करत असलेली कंपनी फार्मा कंपनी असल्याने तिथे दोन शिफ्ट मध्ये काम चालत असे. त्यातील फर्स्ट शिफ्ट म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 4, दुपारी 4 ते रात्री 12 सेकेंड शिफ्ट.
"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले"
प्रकाश परत तेच म्हणत होता.
"अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले.
"सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला.
सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता.
(स्टिफन किंग च्या पुस्तकांचा परीचय विकीपीडियावर वाचल्यावर 'श्या, काही भूतंबितं नीट नाहीत' म्हणून वाचायचं बाजूला ठेवलेलं हे पुस्तक ३ वर्षापूर्वी वाचलं आणि त्याची किंमत कळली. प्रत्यक्ष भूतं वगैरे न दाखवता माणसाच्या मनात भीती निर्माण करणं यात स्टिफन किंग इज अ किंग.)
"व्हिव्हियाना हाईट्स", पुण्याच्या एका उपनगरात जेमतेम 5 वर्षांआधी सुरु झालेली ५फ्लॅट सिस्टम, एकूण 7 मजले , क्लब हाऊस, डेव्हलपर ने प्रि फर्निचर करून दिलेले फ्लॅट व एकंदरीत शहराच्या कलबलाटापासून दूर व तेवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्याही थोडे आतच.
एकूणच जवळील आय टी पार्क मधील नवश्रीमंत व जुन्या पेठांना कंटाळलेले काही पेंशनर लोकांनी भरलेलं व्हिव्हियाना नेहमी शांत असे.
मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
सूरूवात – ३ - अंतिम भाग
मागचा भाग: http://www.maayboli.com/node/55298
“अग पण, त्यांचे काय हाल झाले असतील?” राघुनाथाराव काकुळतीला आले होते.
“ते आपण उद्या सकाळी बघू. आता त्या वाड्यात सकाळशिवाय मी जायची नाही आणि तुम्हाला दोघानाही जाऊ देणार नाही.” रेवातीबाई ठामपणे म्हणाल्या आणि तिथेच ओसरीवर आडव्या झाल्या.
======================================================================
कीर्ती बिछान्यावर पडल्या-पडल्या विचार करत होती.