संस्कृती

गडकरी यांचा पुतळा पाडल्याचा निषेध करणाऱ्यांनी जरा आनंद यादवांची पण आठवण ठेवा!

Submitted by इनामदार on 3 January, 2017 - 23:07

राम गडकरी यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिलेला राजसन्यास नाटकातील काही मजकूर वादग्रस्त असूनही केवळ त्यांच्या इतर लिखाणामुळे त्यांची थोरवी कमी होत नाही. पुतळा पाडणे हे निषेधार्हच. धिक्कार करायचाच असेल तर केवळ त्या ठराविक लिखाणाचाच व्हायला हवा. मंजूर.

गडकरी मास्तरांना पत्र ...

Submitted by अजातशत्रू on 3 January, 2017 - 02:29

गडकरी मास्तरांना पत्र ...
आदरणीय मास्तर... साष्टांग दंडवत ...
आजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही प्रश्न करावेसे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून तुम्हाला विचारावे वाटते की, मास्तर तुम्ही हा लेखनाचा आटापिटा का केला होता हो ? आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत ? चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो ? आज तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल...

मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ...

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 29 December, 2016 - 10:55

मुलगी शिकली, प्रगती झाली. पण स्त्रियांना चूल आणि मूल सुटले आहे का कधी. तुम्ही फुल टाईम गृहीणी असाल तर प्रश्नच नाही, पण नोकरीला असाल तर तरी आपल्या आणि आपल्या नवर्‍याच्या वाटणीचे घरकाम तुम्हाला करावेच लागते. पण हल्ली विभक्त कुटुंबात नोकरी सांभाळून सारेच घरकाम जमणे शक्य नसते. तेवढा वेळच नसतो.
मग भांडी घासायला बाई ठेवली जाते. पण तिला घासायला भांडी काढून देणे आणि घासून झाल्यावर ती तिथेच रचून जात असेल तर जागच्याजागी ठेवायचे काम आपल्यालाच करावे लागते.
मग कचरा साफ करायला देखील बाई ठेवली जाते. पण तिच्यावर लक्ष आपल्यालाच ठेवावे लागते. टोपलीतल्या जमलेल्या कचर्‍याची आपल्यालाच विल्हेवाट लावावी लागते.

मदुराई, रामेश्वर ट्रीपबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मी_आर्या on 27 December, 2016 - 06:18

नमस्कार,

फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे.
बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो.
कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!

मुंबईपासच्या प्रस्तावित शिवस्मारकातील पुतळ्यातील घोड्याच्या पावलांच्या ठेवणीविषयी

Submitted by limbutimbu on 24 December, 2016 - 04:45

सध्या, सर्वदूर बातम्यांमधे, मिडियामधे मुंबईजवळ उभारल्या जाणार असलेल्या शिवस्मारकाबाबत बरेच वाचायला बघायला मिळते आहे. उद्याच त्या स्मारकाचे भूमिपूजन/पायाभरणी आहे.
न्युज मिडियामध्ये, प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपत्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छोटेखानी मॉडेल (प्रतिरूप) बघण्यात आले.
या प्रतिरूपाप्रमाणे, शिवराय बसलेले दाखविलेल्या अश्वाचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले (झेप टाकण्याच्या अविर्भावात) दाखविले आहेत.
देवतांच्या मूर्ति बसविण्याव्यतिरिक्त "व्यक्तिचा पुतळा /मूर्ति" करुन बसवण्याची पद्धत भारतात पूर्वी कधीच नव्हती.

माझा प्रवास - 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा.

Submitted by सचिन काळे on 22 December, 2016 - 23:21

Good morning म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा सकाळी भेटतात तेव्हा एकमेकांना नम्रपणे अभिवादन करताना बोलला जाणारा आंग्ल भाषेतील शब्द. एकमेकांशी बोलण्याकरीता काहीतरी विषय असावा म्हणून सकाळच्या उल्हासपूर्ण वातावरणाचा आपल्या अभिवादनात समावेश केला असावा. आपण जेव्हा कोणत्याही, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींना सामोरे जातो तेव्हा संभाषणाची सुरवात कुठून करावी हा प्रश्न पडतो. खरं तर दोघांनाही थोडेफार अवघडल्यासारखे होत असते. तेव्हा झालेली कोंडी फोडण्याकरिता एकमेकांना 'Good morning' अर्थात 'आजची सकाळ किती सुंदर आहे!!!' असं एकमेकांशी बोलून संभाषणाची सुरवात केली जाते.

परदेशात स्थायिक होणे, गरज की निर्लज्जपणा?

Submitted by सिंथेटिक जिनियस on 18 December, 2016 - 09:49

थांबा थांबा,जुनाच विषय आहे ,मान्य.लगेच मला राष्ट्रभक्तीचे सर्टीफुकट देऊ नका.मी काही तितकासा प्रखर राष्ट्रभक्त नाही.हा विषय मनात आला त्याला कारण हा प्रसंग.

पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.

अरेंज्ड मॅरेज ! हे स्त्रीचे वस्तुकरण नाहि काय!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 9 December, 2016 - 06:31

अरेंज मॅरेज हा आपल्याकडील एक व्यवस्थीत स्थापीत झालेला प्रकार आहे.इतका की लग्नाचा जोडीदार शोधायचा हाच सर्वोत्तम प्रकार आहे हे आपल्या मानसिकतेत घट्ट रुजले आहे.मी नुकताच जेव्हा वयात येत होतो तेव्हा मला हे अरेंज मॅरेज प्रकरण फार रोमॅण्टीक वाटायचे.मुलगा मुलगी एकमेकांना बघतात,एकमेकांशी बोलतात ,एकमेकांना समजुन घेतात हे भारी वाटायचे .

गतं न शोच्यं ! !

Submitted by jayantshimpi on 7 December, 2016 - 09:17

आपल्या भारतात दोन परंपरा सुरु आहेत. त्याविषयी येथे लिहिण्याचा हा प्रयत्न.शासकिय उच्च पदावरील व्यक्ती, जेंव्हा मरण पावते, त्यावेळी राष्ट्रभर अथवा राज्यभर सात्/तीन्/एक दिवसाचा दुखवटा पाळला जाण्याची घोषणा केली जाते.शासकिय जाहिर केलेले कार्यक्रम रद्द केले जातात. मरण कोणालाही चुकलेले नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, हे काही नवीन नाही. कोणतीही व्यक्ती, मग ती आपल्या घरातील असो, समाजातील असो वा उच्च पदावरील असो, दु:ख्ख तर होणारच." मरणांती वैराणी " असे आपल्या कडे म्हटले जाते. मरण पावल्यानंतर, त्या व्यक्तिशी असलेले वैर संपुष्टात येते, आलेच पाहिजे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - संस्कृती