धर्म

देव

Submitted by सदा_भाऊ on 8 September, 2018 - 21:15

देव

देव भेटाया पहावे, तो भेटणार नाही
देवळांच्या गाभाऱ्यात, देव लपणार नाही

भेटेल का तो मुर्तीत, दिसेल का भक्तीत
किती काही यत्न केले, नजरेसी दिसणार नाही

अभंगाची गोडी भारी, सुरामधे जादू न्यारी
किती सुर आळवीले, समोरी येणार नाही

पुजा अर्चा प्रपंच खरा, साकडं घाला काही करा
इथं तिथं शोधा त्याला, कुठेच तो भेटणार नाही

पोथी कितीदा वाचली, स्त्रोत्रे कित्येक गायिली
कुठे लपला कोण जाणे, काही केल्या मिळणार नाही

देव आईच्या कुशीत, देव चिमणीच्या चोचीत
चराचरा वास त्याचा, आसमंती लपणार नाही

विषय: 

गणपती

Submitted by prajganesha on 31 August, 2018 - 23:28

आम्हाला घराला सुंदर टेरेस होति जी आम्ही छान सीलिंग घालून मोठ्या खिडक्या घालून एक रूम केली खरतर आमचा तो डायनिंग अरीआ आहे आम्ही या वर्षी गणपती आणत आहोत ती जागा दिशेन सुधा योग्य आहे तर आम्ही गणपती स्थापना तिथे करू शकतो का .
कारण ती एक स्वतंत्र रूम होईल जिथे फक्त गणपती बद्दल च पूजा अर्चना होईल .इथे तिथे कोणाचे हात लागणार नाही पण ती टेरेस होति अस चालेल का

प्राचीन विश्वेश्वर मंदिर

Submitted by Mandar Katre on 27 August, 2018 - 01:38

ॐ नम: शिवाय .
कोकण म्हणजे देवाची भूमी .रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यातील आमच्या चोरवणे गावात एक शिवकालीन पुरातन श्री विश्वेश्वर मंदिर आहे . हे मंदिर सुमारे पाचशे वर्षापेक्षा अधिक जुने असल्याचा अंदाज आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले असून मंदिरापासून दीड किलोमिटर अंतरावरून बावनदी वाहते.

तुम्ही पाहिलेल्या अंधश्रद्धा???

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 12:50

रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.

मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.

शब्दखुणा: 

मोक्ष असतो असे वाटणारे लोक आहेत?

Submitted by कटप्पा on 2 July, 2018 - 11:17

बुरारी ची बातमी पाहिली. एकाच कुटुंबातील 11 जणांनी एका विशिष्ट वेळी आत्महत्या केली. कारण काय तर मोक्षप्राप्ती.
हस्तलिखित नोट्स सापडल्या आहेत त्यात बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.
आत्महत्येचा दिवस निश्चित होता. आत्महत्या कशी करायची हे देखील ठरलेले होते. डोळे बंद नसतील तर मोक्ष मिळणार नाही वगैरे वगैरे स्टेप्स डिटेल मध्ये लिहिल्या आहेत.

खरच मोक्षप्राप्ती असते असे लोकांना अजून वाटते???

बातमी -
A date with god: Handwritten notes reveal chilling details of Burari deaths

महाभारताचा पुरावा ?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 6 June, 2018 - 11:36

महाभारताचा पुरावा? आढळले पाच हजार वर्षापूर्वींच्या महाभारत युद्धा चे अवशेष

भारतीय संस्कृती प्राचीन काळी किती पुढारलेली होती, नागरीकरण कसं होतं, जगातल्या अन्य संस्कृतींच्या इतकी प्राचीन भारतीय संस्कृती आहे का अशा अनेक प्रश्नांबद्दल अनेक मतं व्यक्त होत असतात. परंतु आता पुरातत्व खात्याच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे ते म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये रथ होते, तलवारी होत्या, शिरस्त्राणं होती, खंजीरासारखी शस्त्रे होती आणि विशेष म्हणजे ही सगळी युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.

ग्रामगीता पुस्तक परिचय भाग 2

Submitted by शशिकांत ओक on 25 March, 2018 - 12:24

ग्रामगीता मुखपष्ठ.jpgभाग 2
विविध पंचक योजनाकरून गीतेचे विषयानुरूप आठ विभाग पाडले आहेत, ते असे -
पहिल्या सद्धर्म पंचकात देव, धर्म, आश्रम, संसार-परमार्थ आणि वर्णव्यवस्था यावर भाष्य आहे.
दुसऱ्या लोक वशीकरण पंचकात संसर्ग-प्रभाव, आचार-प्राबल्य, प्रचार-महिमा, सेवा सामर्थ्य, आणि संघटना-शक्ती याचा विचार केला आहे.

विषय: 

मृत्यू

Submitted by अभिषेक देशमाने on 7 March, 2018 - 11:16

भाग - १

लिंगायत धर्मियांना मरणे पावणे किंवा लिंगैक्य होणे उत्सवासारखे आहे. तो का उत्सव आहे याचे वर्णन करताना बसवलिंग महाराज अभंगात म्हणतात,

मरणा भीणे भीती जीव।

आम्हा मरण्याचा उत्सव ।।१।।

कधी मरु कधी मरु।

कधी देहाते विसरू ।।२।।

हेचि आमचे चिंतन।

मागू सांबापासी दान ।।३।।

बसवलिंग म्हणे मरा।

ऐशा मरणे चुके फेरा ।।४।।

शब्दखुणा: 

थोडेसे गीतेबद्दल ...

Submitted by निमिष_सोनार on 3 January, 2018 - 07:59

अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे दोन लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे.
चूकभूल द्यावी घ्यावी! त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! - निमिष सोनार

* * * || लेख क्र १ || * * *

कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,

Pages

Subscribe to RSS - धर्म