ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कालच्या भागात बरेच काहि दाखवले. १) सन्थ निरंजन बाबा ओफिसला जातात पण वाटेत doctor भावु भेटतो, आणि zee चे सगळ्या serials साठि common coffee shop मधे coffee घेत बाळ हरवल्याचि घटना discuss केलि.
२) आणि हे ध्यान हाफिसात न जाता घरि येताना एक वेडसर व्यक्ती भेटते.
३) इथे त्या साठे काकुच्या घरि चौकडी मिळुन ति आत्म्याचि colour print discuss karataat.
4) मोनु चेन्डुच्या शोधात रमाच्या हाति लागतो
५) मोनु हरवला म्हणुन ति शोभा कांगावा करते.
६) दाढिवाल्याला मोनु रमाच्या मान्डिवर सापडतो.

पुढे रमाच wicked हसु continue.........

अपर्णा, त्यांना चांडाळ चौकडी का म्हणताय?
आणि शोभा कांगावा नाही ओ करत. ती खरी काळजी होती ना मुलगा भेटत नाहीये, हरवलाय म्हणुन.
असो. एकंदर मी लवकरच ही मालिका बघायची बंद करणार. मी खरंच कय्च्याकय सहन करु शकत नाही.

पण ही शेजार्‍यांना का घाबरवतेय? मंगल असेल तरीही आणि रमा असेल तरीही शेजार्‍यांना / लहान मुलाला घाबरवण्याचा काय संबंध?

मोनू स्वप्नाच्या दुनियेत गेला असं म्हणतेय>>>>>>>> अशाने निरु हिच्या विरोधात नाही का जाणार.
ते हॉस्पिटलातलं बाळ हरवलंय ते डॉक्ट्र सांगत होता तेव्हाही निरुला रमाचीच आठवण आली.
आता मोनुला काही झालं तर तो तिच्या विरोधात जाईल.
म्हणजे असं मला वाटतं लेखक दिग्द ला वाटलंच पाहिजे असं नाही. Happy

झीच्या सिरीयली म्हणजे माती आणि पाणी

बाकी डॉक्टर च्या भूमिकेत घेतलेल्या कलाकाराने 'ठोकळा' ची नविन व्याख्या आपल्याला दिली आहे.. प्रदीप कुमार, भारत भूषण यांना आता चीरशांती मिळेल. त्याच्या तुलनेत निरू बाबा बरे आहेत.
ते अंगाई गीत फारच हासायला लावते.. ही मालिका अचाट अतर्क्य वर्गात दाखल झाली आहे. so forget the logic or mystery.. just watch how they continue STY.

बाकी डॉक्टर च्या भूमिकेत घेतलेल्या कलाकाराने 'ठोकळा' ची नविन व्याख्या आपल्याला दिली आहे.. प्रदीप कुमार, भारत भूषण यांना आता चीरशांती मिळेल. त्याच्या तुलनेत निरू बाबा बरे आहेत.>>>> खरं आहे...आधी निरु बोलायला लागला की वाटायचं थोबाडीत मारुन म्हणावं 'पटपट बोल काय बोलायचंय ते'. पण डॉ. (?) ठोकळा पाहून निरु फारच सुसह्य वाटायलाय. Happy

एका प्रतिसादात जसे म्हटले आहे भरकटलेली सीरिअल आहे ,मला हि भरकटलेल्या भुतांची सीरिअल वाटते Happy यातील सर्वच असे भीतीदायक बघतात ना एकमेकांकडे ... म्हणून लहान मुलगा छान आहे .. का रे दुरावा मधला आहे ना तो ..प्रसंगांपेक्षा म्युझिक जास्त भीतीदायक आहे....एक इंटरव्हू ऐकला, पल्लवी सांगत होती मला टीव्ही पाहायला वेळच मिळत नाही अजिबात !

बर कोणी निरुबाचि बाईकवरुन उतरताना हेल्मेट काढतेवेळी केस मागे झट्कायचि अदा पाहिली का?? हाय SSSS जणुकाहि राहुल रॉय....

बाई म्हणल्या (निरू ला) : काऊ ला बोलाव
आई म्हणल्या: काय काव काव झालीये आयुष्याची.. या पूढे जे काही चाऊ म्याऊ काटे खाऊ होईल त्याला निराऊ तू जबाबदार..
मग निरू त्याच्या खोलीत जाऊन बसला...
मग बाईंनी दरवाजा उघडून विचारलं, काऊ नही तो मै आऊ?
तिकडे मोनू म्हणला मावशीच (रमा) माझी आऊ..
तीच्या लाडू मुळे आली गाऊ..
साठे म्हणाले ऊषाला ही तुझ्या भोचक कर्मांची फळे हाऊ.. आता खाऊ..
ऊषाला आठवले मंगल च्या संसारात आपण केलेल्या काड्यांची लऊ.. (म्हणजे जाळ बर का!)
आणि मग तो भिकारी?म्हातारा?भटका? रमा व निरू ला म्हणला तू भी जाऊ.. वो भी जाऊ...
त्यावर रमा ने भेदक कटाक्ष टाकून त्याच्यावर केले भाऊ भाऊ..
तो घाबरून गेला काऊ माऊ..
आता मालिका सोडून सगळे घरी जाऊ..
Happy

योग>> Lol

मी ही मालिका बघणे सोडून दिले. पण इथले प्रतिसाद वाचते. एक से एक आहेत सगळे Lol

Pages