रावसाहेब वाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांचं मन पश्चातापाने व्यापलं होतं. बाळूवर आपल्या मुलावर आपण किती अन्याय केले हा एकच विचार त्यांच्या मनात घोळत होता. वाड्यात येताच बाळूला शोधत पूर्ण वाडा त्यांनी पालथा घातला. शेवटी ते गोठ्यात गेले. तिथे बाळू गाईंना चारा देण्यात मग्न होता. बाळूला पाहताच रावसाहेबांनी त्याला आलिंगन दिले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले. रडक्या घोगऱ्या आवाजात ते बोलत होते, “मला माफ कर बाळा, माफ कर!
त्या रात्री रावसाहेबांना झोपच लागली नाही. मनात बकुळाच्या आठवणींचा पूर आला होता. त्यांनी घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजून गेले होते. बाळूदेखील गाढ झोपला होता. ती पेंटिंगमधली बाई त्याच्या स्वप्नात आली होती. ती बीछान्यावर पहुडली होती व बाळूकडे लडिवाळ हसत पाहत होती आणि बाळू एकेक पाऊल टाकत तिच्या जवळ जात होता. आता बाळू तिच्या अगदी जवळ आला होता इतक्यात त्याच्या पाठीत वेदना उसळली व पाठोपाठ रावसाहेबांचे तिखट शब्द त्याच्या कानावर आदळले. “भाsssssडया उठोतोस की हणू अजून एक लाथ पाठीत!” रावसाहेब कडाडले, तसा बाळू पाठ चोळतच उठला व थेट स्वयंपाकघरात गेला व पाचच मिनिटात हातात चहाचा कप घेऊन आला.
कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच स्वयंपाकघरात गेला. त्याने गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं व एका बाजूला चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं. चहा तयार होताच त्याने तो कपात ओतला व कप घेऊन तो थेट व्हरांड्यात आला. पण रावसाहेब तिथे नव्हते. इतक्या वर्षात असं पहिल्यांदाच घडत होतं. बाळू अंगणात गेला पण तिथेही रावसाहेब दिसत नव्हते. बाळू पुन्हा वाड्यात आला. तो थेट रावसाहेबांच्या खोलीपाशी आला. आतून घोरायचा आवाज येत होता. बाळूने हळूच खोलीचा दरवाजा सरकवला. आत बेडवर रावसाहेब गाढ झोपले होते.
कित्ती कित्ती वर्षे झाली त्या असायला !त्या कधी गेल्या तेही आठवत नाहीय. आठवते ती त्यांची छोटेखानी मूर्ती! ,आत्या आज्जी !आजोबांची बहीण! खूप सुरकुत्या असलेला त्यांचा चेहरा ,काटकुळी देहयष्टी,नऊवारी साडी !
आपण बऱ्याच लेखकांनी लिहिलेले व्यक्तिचित्रणे वाचतो. पुलं, वपु आणि इतरांनीही बरीचशी व्यक्तिचित्रणे लिहिलीत. आणि त्या व्यक्ती प्रसिद्धही झालीत. तर प्रश्न असा आहे की व्यक्तिचित्रणे काल्पनिक लिहिलेली असतात का? की ती सर्वच्या सर्व खरीखुरी माणसे असतात, जी त्या त्या लेखकांना त्यांच्या जीवनात भेटलेले असतात?
नाही... सॅम अंकल नाहीये ते. सम अंकलच. मुळात सोम अंकल. खरतर काहीही म्हटलेलं चालायचं आम्ही पोरांनी त्यांना. पोरच काय बाकीचेही त्यांना वेगवेगळ्या नावांनी बोलवायचे.
मिस्टर सोमसुंदरम, मिस्टर सोम, सोम अंकल, नुस्तच ओ काका.. ते सम अंकल वगैरे मग आम्हा पोरांनी सुरू केलेली धतिंग.
मारलेल्या हाकेबरहुकुम ते उत्तरायचे.. म्हणजे. येस्सार... पासून काय गं पोट्टे ... ते... ’धा’!
मी पुण्यात २००८-२००९ या वेळेत नवी पेठेत राहायचो. आम्ही तिथे ५ जण होतो. २ बेडरूम चा फ़्लँट होता. मी त्याआधी बँगलोर १.५ वर्ष राहून आलो होतो. मेस चे जेवण खाऊन आम्ही कंटाळलों होतो. मग त्यामुळे आम्ही तिथे स्वंयपाका साठी बाई शोधात होतो. आणि आमची ओळख आज्जीशी झाली.
महेश NEWS शब्द कसा तयार झाला ? सांग. आता पाचवीपासुन तुम्हाला इंग्रजी विषय चालू झाला आहे ना मग सांग पाहू. आता नुकताच ABCD शिकून जेमतेम एक वर्ष झालेल्या मला हे कळणे शक्यच नव्हते, आणि तेव्हा गुगल सोडाच पण कॉम्प्युटर, सेलफोन तर नाहीच पण साधा लॅन्डलाईनचा फोन पण नव्हता, म्हणजे फोन ओ फ्रेन्ड ऑप्शन पण नाही अजिबात. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाच साकडे घालायचे आम्ही, मग आमचे विठोबा काका अगदी खुशीत येऊन सांगणार अरे सोपे आहे North, East, West, South मधले सुरूवातीचे अक्षर घ्यायचे की झाला NEWS, बातम्या कशा चोहो बाजुंनी येत असतात. हे असे सांगितले की आम्ही खुश.
आई-वडिल, दोन भाऊ, पाच बहिणी, वडिलांच्या बहिणीचं त्याच आकाराचं कुटुंब. सगळे जेवायला बसलेत. कशावरून तरी विषय निघतो आणि कुटुंबातला ८ वर्षे वयाचा मुलगा उठून उभा रहातो. 'प्रेम हीच जगातली एकमेव श्रेष्ठ भावना आहे' यावर जवळपास अर्धा तास एकटा बोलत रहातो आणि अख्खं कुटुंब मंत्रमुग्ध होऊन चिडीचुप्प ऐकत रहातं. मुलाचं बोलणं ऐकून वडिलांना भरून येतं, त्याला जवळ घेऊन सगळ्यांना म्हणतात, बघा बघा, माझं पोरगं कसं बोलतंय.. प्रसंग १९५२-५३सालच्या सुमाराचा. कुटुंब मुस्लिम.
है स्साला....
अभी अभी हुआ यकीं
के आग है ...
तीरांचं कसं असतय बघा, तीर तीर पे लिखा है निशान-ए-दिलका नाम!
म्हणजे काही तीर अगदी जवळून... कानाला वारा देऊन जातात... काही चक्कं वळसा घालून... पण आपलं नाव लिहिलेला तीर? तो पत्ता शोधत येतोय... तुम्ही कुठे खाचपटीत, तळघरात बसा... काही खरं नाही.. घुसायचं तेव्हा घुसतो, आणि करायची ती तबाही करतोच.