श्री प्रभाकर भोगले हे मराठीतील एक प्रसिद्ध लेखक आहेत. काही दिवसांपूर्वी एका WhatsApp group वर मला त्यांनी लिहिलेला एक लेख forwarded message म्हणून मिळाला. त्यांनी त्याचा शेवट मुद्दाम अशा पद्धतीने केला होता की प्रत्येक वाचक पुढचा विचार त्याला हवा तसा करु शकेल ...
या कथाबीजाचा विस्तार करण्याचा मी एक प्रयत्न केला आहे ... लेख थोडासा मोठा झाला आहे... पण तुम्हाला आवडेल अशी आशा ..
"मनधरणी"
दिवसभर पोटांसाठी लाचारासारखी घिसापिट करून
बॉसचं ऐकून थांबल्यानं रात्री उशीरा घरी परतलो तेव्हा
फणकाऱ्यानं ती जेव्हा म्हणाली,
'कशाला आलास आत्ताशी ? काळं कर तुझं थोब्बाड'
खरं सांगू ? मलाही वाटलं द्यावा तिला एक जवाब, थुत्तरफोड !
प..पण..
सोफ्यावर निजलेल्या त्या चिमुकल्या जिवाला बघून शांत झालो मी
आणि
उद्याच्या शांतीसाठी घेतलेला पांढरा गजरा काढून धरला तिच्यासमोर
तेव्हा
तोही हसला माझ्यासारखाच दीनपणे केविलवाणा होऊन,
तिची मनधरणी करायला !
―र!/२४.५.१८
[थुत्तरफोड शब्दासाठी साभार, मायबोलीकर.]
मुग्धाला आज उशीरच झाला होता. डोक्यावरची पाटी सांभाळत झपाझप पावलं टाकत ती निघाली होती. सूर्य आग ओकत होता, रस्ते खचाखच ट्रॅफिकने भरलेले. हीच तर वेळ धंद्याची असते. लवकरात लवकर लकडी पुलाच्या सिग्नल ला पोहोचायला हवं, तिथे दुपारपर्यंत चांगले गजरे विकले जातात. आज संध्याकाळच्या आत पाटी संपवून वीणा सोबत तळ्यातल्या गणपतीला जायचं असं ठरलेलं होतं दोघींचं. वाट काढत पोहोचली आणि नेहमीच्या ठिकाणी चिरक्या आवाजात ओरडत कामाला लागली.
तुझ्या मुग्धतेवरच मी भाळले
शब्दांचे गजरे गुंफित गेले
माझे बोल तुला स्मरत राहिले
मला काहीच आठवेना झाले....
तेव्हा त्या गजर्यालाच साक्षी केलंस!
प्रत्येक फुल पायदळी तुडवलंस
खर्या खोट्याचा बाजार मांडून
माझ्या प्रेमालाच ’वेश्या’ केलंस!