श्री गणेश
स्कूल चले हम.....!
गणपतीचे दिवस. दुपारी बारा, साडेबाराची वेळ. पुण्यातले रस्ते. रस्त्यात वेडेवाकडे उभारलेले मांडव. त्यातच खास गौरी गणपतीच्या वस्तूंनी सजलेले असंख्य स्टॉल्स. खरेदीसाठी उडालेली झुंबड. त्यामुळे होणारं ट्रॅफिक जॅम, कर्कश्य हार्न्स आणि त्यातुन कासवाच्या वेगानं जाणारी वाहनं. नायर सरांकडे मी क्लास साठी निघाले होते.
आज १९ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबर २०११ पर्यंत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे पंधरावा नाट्यमहोत्सव सुरू होत असून भारतातील विविध भाषांतील रंगकर्मी तेथे आपल्या कलागुणांचा आविष्कार करतील. मराठी मनाला 'नाट्यवेड' ही संकल्पना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, पण अशा महोत्सवाच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध प्रांतातील नाट्यविषयी कलाजीवन कशारितीने फुलत गेले आहे याचा लेखाजोखा काढता येतो.
आपल्या विधायकांच्या बेजबाबदार करणीमुळे दहशतवाद नक्कीच फोफावेल!
तिची आणि माझी भेट झाली त्याला दहा वर्ष तरी होऊन गेली असतील. ऑफिसच्या एका ट्रेनिंग मधे आम्ही पहिल्यांदा भेटलो. उंच, थोडीशी स्थूलच म्हणावी अशी शरीरयष्टी, वर्ण सावळा, आखूड केस, दिसायला सर्वसाधारण...पण तिचे डोळे वेगळेच होते, खूप काही सांगणारे बोलके डोळे, त्यात कारुण्याची एक हलकीशी झाक होती.
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक गाव पनवेल पासून २२ किलो मिटर तर उरण शहरापासून १६ किलोमिटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल खेडेगाव. आजूबाजूला डोंगर, तळी, खाडी ने आच्छादलेल हे छोटस खेडं.
![](https://lh3.googleusercontent.com/-RxjN9nSftJQ/Tme417Cck-I/AAAAAAAACvo/_HnjG_Y8R94/s800/Picture%252520275.jpg)
१ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
काल दिनांक १०/९/२०११ रोजी जाहीर झालेल्या निकालात माझ्या खालील कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
कर्नाटकातल्या अनेक जंगलांपैकी महाराष्ट्रातून पोहोचण्यास तसे सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे दांडेली-अणशी व्याघ्रप्रकल्प. म्हणूनच बेळगावपासून अवघ्या ९० कि.मि.वर असलेले दांडेली वन्यजीवप्रेमींसाठी आकर्षण न ठरले तरच नवल. अगदी पुण्या-मुंबईहून भल्या पहाटे स्वतःच्या गाडीने निघाल्यास दुपारी जेवणापर्यंत येथे येऊन पोहोचता येते.
ईथे सिडनी मधे आल्यापासून वेगवेगळ्या देशांचे लोक भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना खूप गंमत येते. प्रत्येकाची बोलण्याची त-हा वेगळी आहे. पण एकंदर लोक मात्र खूप प्रेमळ आहेत. समोरासमोर आले की अभिवादन करतात, स्मितहास्य करून कसे आहात याची चौकशी करून पुढे जातात.
शाळा... एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा चालू असताना कधी संपणार ही? असं वाटणारी...आणि जून महिना सुरु झाला कि कधी एकदा सुरु होतेय असं वाटणारी...शाळा.