लेख

प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत

Submitted by rkjumle on 4 September, 2011 - 09:48

दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुध्द धम्माचे मूलभूत सिध्दांत आहेत. हे चारही सिध्दांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिध्दांत ईतका महत्वाचा आहे की, जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो असे भगवान बुध्द म्हणतात. या सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मरणावस्था प्राप्त करणे अशा या संपुर्ण भवचक्राचा उलगडा केला आहे. जन्म आणि मरणाचा हा क्रम अनादिकाळापासून एखाद्या चक्राप्रमाणे अखंड गतीने चालत आलेला आहे.

गुलमोहर: 

दुप्पट प्रेम

Submitted by vandana.kembhavi on 4 September, 2011 - 01:21

आज सहजच मनांत आले की आपल्याला रोजच्या जीवनांत छोट्या छोट्या गोष्टींमधून किती आनंद मिळत असतात, ते जर जपून वापरता आले तर आपल्याला दुःखी व्हायची वेळच येणार नाही. किती वेळा आपल्याला अपेक्षा नसतानाही किती जणांकडून प्रेम मिळत, ते प्रेम देखील आपण ईतरांना वाटायला शिकलो तर कित्येक पटींनी वाढून ते पुन्हा आपल्याला परत मिळेल....आणि मन गेलंच की आठवणींच्या हिंदोळ्यावर...

गुलमोहर: 

केल्याने देशाटन.......तीर्थाटन|

Submitted by शिवंजय on 31 August, 2011 - 15:02

http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2011/08/blog-post.html
केल्याने देशाटन.......तीर्थाटन|
प्रोफ. डॉ.संजय होनकळसे M.A. M.Com.M.Phil,M.D.(A.M.),LL.B.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कलाकृतीचे स्वरूप कशामुळे ठरते?

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2011 - 05:48

परवा एका कवयित्री मैत्रिणीसह प्रेरणा व आविष्काराची प्रक्रिया यावर अत्यंत रुचकर चर्चा झाली.

चर्चेत बहुतांशी त्या त्यांच्या व त्यांच्या वाचनात, संपर्कात आलेल्या अनेक कवी, लेखकांच्या कलाकृतींमागील प्रेरणा उदाहरणादाखल देत असतानाच इंदिरा संतांची खालील आशयाची कविता त्यांनी ऐकवली.

'तू गेल्यानंतर मी सहज पटाचा डाव मांडून बसले आणि शेवटी असह्य होऊन तो डाव मीच उधळून लावला कारण तुझ्याशिवाय मला कशातही रस उरलेला नाही. तुझ्याचकडे यायचे म्हणून डोहात उडी मारायला गेले तेव्हा डोह तुझ्या हातांची ओंजळ बनून मिटत होता'

गुलमोहर: 

आकड्यांची गम्मत.......

Submitted by manas on 29 August, 2011 - 03:20

माझ्या जवळ येवढी बुध्दीमत्ता नाही की मी याचा शोध लावावा.....
ज्याने कुणी हा शोध लावला असेल त्याला सलाम..............

आणि अगदी मन:पुर्वक आभारासह ......तुमच्या माहीतीसाठी ............

Now, take a look at this...

101%

From a strictly mathematical viewpoint:

What Equals 100%?

What does it mean to give MORE than100%?

Ever wonder about those people who say they
Are giving more than 100%?

We have all been in situations where someone wants you to

GIVE OVER 100%...

How about ACHIEVING 101%?

What equals 100% in life?

गुलमोहर: 

बुध्दाचा धम्म निराशावादी आहे काय?

Submitted by rkjumle on 29 August, 2011 - 02:37

नव्या प्रकाशाच्या प्राप्‍तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते. जगातील व्यथा आणि दु:ख ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे असे त्यांनी मान्य केले. परंतू दु:ख कसे नाहिसे करावे ह्या प्रश्‍नाचा विचार सांख्य तत्वज्ञानाने केला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्‍नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले.

गुलमोहर: 

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

Submitted by रणजित चितळे on 28 August, 2011 - 23:43

जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.

अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही.
ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील.
क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत.
ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो. अण्णा हजारेंची मागणी अवास्तव आहे.

गुलमोहर: 

हा घास चिऊचा

Submitted by vandana.kembhavi on 28 August, 2011 - 20:10

नांदिवलीच्या घरात रहायला येणे हा आमच्या आयुष्यातला अगदी परमोच्च आनंदाचा क्षण होता.
आम्ही दोघांनी मिळून घेतलेले ते पहिले घर!
घराचा जास्तीत जास्त भाग पुर्व दिशेला, त्यामुळे घरात भरपूर उजेड. त्यात आजूबाजूला चिकटून ईमारती नसल्यामुळे त्या उजेडाला काहीच अडसर नव्हता. सकाळी सूर्य उगवला की घर सोनेरी रंगाने न्हाऊन जाई. एक कोपरा तर ईतका सोनेरी दिसे की मी त्या कोप-याचे नामकरण "सोनेरी कोपरा" असेच केले होते.

गुलमोहर: 

मी जिंकलो! मी हरलो!!

Submitted by pkarandikar50 on 28 August, 2011 - 06:56

मी जिंकलो! मी हरलो!!

अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी संसदेने एक दिवसाच्या चर्चेनंतर अण्णांच्या तीन मागण्यांचा समावेश 'यथायोग्य' पद्धतीने जनलोकपाल बिलात करण्यास एक मताने ' तत्वतः' मान्यता दिली. अण्णांचे समर्थक आंदोलक आणि वृत्तवाहिन्यांनी 'अण्णा जिंकले' असा जल्लोष केला असला आणि उपोषण स्माप्त झाले असले तरी प्रत्यक्षात कोणी काय कमावले आणि काय गमावले हे तपासून पहावे लागेल.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख