माझ्या जन्म झाला तेव्हा माझी जन्मपत्रिका काढली गेली. ती जन्म झाल्यावर लगेच काढली की दोनचार वर्षांनी ते आता आईला विचारावे लागेल. ती कुठली पद्धत वापरून काढली, कोणी काढली याची मला कल्पना नाही. पण जेव्हा जेव्हा घर आवरताना ती आईला सापडली तेव्हा तेव्हा मी ती कौतुकाने जरूर वाचली. प्रत्येकवेळी हेच लक्षात आले की त्यात जे जे लिहिले होते तेच जवळपास माझ्या आयुष्यात घडलेय.
उदाहरणार्थ, भावंडांचे फार सुख नाही.
आणि हो, खरेच की! मी एकुलता एक आहे 
पत्रिका
कोणतेच दुःख मला नव्हते
एव्हढेच की सुखही नव्हते
अंगिकारले जरी सत्यवचन
वृथा बोलणे रक्तात नव्हते
जीवास जीव लावावा वाटले
जिवाभावाचे जिवलग नव्हते
का ग्रहताऱ्यास दोष देऊ
पत्रिकेत आखलेले घर नव्हते
आठवणीत गेल्या भेटी गाठी
जगाला मी जगतो माहीत नव्हते
राजेंद्र देवी
सुरुवात माझ्यापासून करतो
माझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.
माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.
*1) जात*
प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?
मी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.
तसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.
त्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.
" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे", ती मला म्हणाली. हे ऐकताना मी माझा चेहरा शक्य तितका स्थिर ठेवायचा प्रयत्न करीत होतो हे मला जाणवत होते. त्यामुळे बहुतेक वाक्य माझ्या कानीच पडत नव्हती. परंतु जे ऐकायचे ते ऐकले. हिचे लग्न ठरले होते आणि आता माझ्या पुढे पर्याय उरले नव्हते. त्यामुळे आता पुढचे पाउल कुठे आणि कसे टाकायचे ह्याचा विचार करावा लागणार होता. ऑफिस ह्या क्षेत्रा पुरते सारे पर्याय संपुष्टात. आणि आता पर्यायच हवे असतील तर नोकरी बदलायला लागणार होती. पण मी इथे रुजू होऊन वर्ष पण झाले नव्हते.
हो - नाही - हो करता करता अखेर फायनल झालेलं आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था लवकरच मंगळावर (तोच तो आपल्या भारतीयांच्या जीवनात 'चहा' , इस्त्री यांच्या खालोखाल 'कडक' मानला जाणारा…) यान पाठवणार आहे. मोहीम यशस्वी होईल असं गृहीत धरू.. नाही धरू'च' (कारण शेवटी आपल्या खिशातूनच जाणार आहेत हे पैसे). सारे काही नियोजनानुसार झाल्यास या महिन्याच्या अखेरीला भारताचे 'मंगलयान' मंगळाच्या दिशेने झेपावेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ आपली मुद्रा आणखी ठळक करतील.
आता मला अशी शंका आहे कि, जर आज - उद्या - १०० वर्षांनी मंगळावर वस्ती शक्य झाली तर....