छत्रपती शिवजी महाराजांनी ३ एप्रिल १६७९ रोजी लिहिलेले हे पत्र औरंगजेबाला लिहिलेले बहूदा शेवटचे पत्र असावे. ह्या पत्रात ते जिझिया कराकरिता औरंगजेबाचा तीव्र शब्दात निषेध करतात आणि पुर्वीच्या पादशहांची, खास करुन अकबराची आठवण करुन देतात. 'पादशहाचे घरी दारिद्र्याचा वास जाहला', 'या प्रकारचे करण्यातच पुरुषार्थ पादशहा समजतात', 'गरीब मुंग्या चिलटासारख्या आहेत त्यांस उपद्रव करण्यात मोठेपणा नाही.' असेही बजावतात.
*********************************************************************************
३-४ दिवसापुर्वी अचानक फेसबुकवर एका मित्राने एक शिवकालीन पत्र सापडले अशी पोस्ट टाकली आणि सोबत खाली दिलेल्या पत्राचा हाच फोटो दिलेला होता. मला अत्यानंद झाला. पण क्षणापुरता....... कारण.....
शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात १५ तारखेला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले होते. या पत्रामुळे दादाजी व त्यांचे बावा चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले.
मराठा इतिहास दिनविशेष - एप्रिल महीना ... भाग १
१५ एप्रिल १६४५ - शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या १५ एप्रिल रोजी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शिवाजी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली.
३० एप्रिल १६५७ - शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करून ते लुटले.
२९ एप्रिल १६६१ - शिवाजी राजांनी फेब. ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ मे ला जिंकून घेतले.
१५ एप्रिल १६६७ - शिवाजी राजे आणि पुतळाबाई यांचा विवाह.
९ एप्रिल १६३३ -मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला.
८ एप्रिल १६५७ - २७ वर्षीय शिवाजीराजे आणि काशीबाई यांचा विवाह.
५ एप्रिल १६६३ - सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला.
मराठा इतिहास दिनविशेष ... फेब्रुवारी महिना... भाग १..
११ फेब्रुवारी १६६० - औरंगजेबाने मुख़्तारखान याला दख्खनेची जबाबदारी सोपवून औरंगाबाद येथे पाठवले.
११ फेब्रुवारी १६७१ - होळीच्या सणाचा फायदा उठवून सिद्दी कासिम याने दंडा राजपूरी येथील सामराजगड़ जिंकला. सिद्दीवर जरब बसावी म्हणून शिवाजी राजांनी जमिनीच्या बाजूने सामराजगड तर पाण्याच्या बाजूने कंसा येथे पद्मदुर्ग बांधले होते. परंतु कालपरत्वे हे दोन्ही किल्ले सिद्दीच्या हाती गेले.
१ फेब्रुवारी १६८९ - 'छत्रपति संभाजी महाराज' मुघलांच्या तावडीत ... !