प्रवास वर्णन लिहिण्यात एक वेगळीच गम्मत असते ती म्हणजे पुन्हा एकदा नकळत का होईना आपण तो प्रवास करतो. अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा कागदावर येतात. सगळं काही आठवायला लागत. आठवायची गरज पण भासत नाही कारण माणसाला आठवण तेव्हा येते जेव्हा तो विसरतो. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला आपण तो प्रवास करवत असतो. आणि जेव्हा ऐकणारी माणसं संपतात, तेव्हा आपोआपच सांगणारा पेन आणि वही जवळ करतो. जसं आता मी केलय. रत्नागिरी चा प्रवास थोडक्यात.
वीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.
हातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.
मार्ग :
कल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे