गेल्या काही वर्षांत अनेक अशा गोष्टी घडल्यात, ज्यामुळे आपण या देशाचे नागरिक आहोत याची लाज वाटावी, जेव्हा आपण सर्वच लोक भारतातील न्यायव्यवस्था, राजकारणी, प्रशासन मूर्खात काढले गेलोय, फसवले गेलो आहोत. इथं फक्त अश्या घटना लिहिणं अपेक्षित आहे. कुणालाही धरून झोडपणे हा उद्देश नाही, फक्त हतबलता व्यक्त करण्यासाठी हा धागा आहे.
जरा खरात बाबाचे व्हिडिओ social media वरून हटवायचे आदेश आले नाही तोवर अन्न आणि औषध खात्याचा भार सांभाळणारे मंत्री आणि NCP चे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांचे व्हिडिओ सोशल मीडिया वर फिरू लागले आहेत.
यात झिरवळ आणि एक व्यक्ती (ब्लर केली आहे) जेवतात, पलंगावर बसून मद्यपान करतात, शेवटी झिरवळ झोपले आहेत आणि ती व्यक्ती कपडे ठीक करत आहे असे दिसते.
व्हिडिओ लपून काढला आहे ,किंवा spy cam plant करून काढला आहे असे वाटते.
हा व्हिडिओ 7 महिने जुना आहे.
विरोधकांनी नेहमीप्रमाणे राजीनामा मागितला आहे.
पण यात नक्की कायदा कुठे मोडला गेला आहे?
पुण्यात १९ जानेवारीपासून भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे वेळापत्रक. ( अधिकृत वेबसाईटनुसार)
एक दूरचे ओळखीचे गृहस्थ सांगत होते कि ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी मुंबई पुणे एक्स्रेस वे जाम झाला होता. गुगल मधे मुंबई पुणे ट्रेफिक जाम / वाहतूक कोंडी असे की वर्डस सर्च म्हणून दिले कि दिसते कि पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पण नववर्षाच्या स्वागताला एव्हढा मोठा प्रकार झालाय यावर विश्वास बसला नाही. कारण कुठेही यासंबंधाने ( मला तरी) ऐकू आले नाही कि वाचनात असे काही आले नाही. कुणाचाच विश्वास बसला नाही. कारण जर कुठे बातमी नाही तर यांना ४५ किमी जाम आहे हे गाडीत बसून कसे समजले हा प्रश्न होता.
काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव
कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.
सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
गंगोत्रीहून सोनप्रयागच्या वाटेवर पाय मोकळे करायला बसमधून उतरलो होतो तेव्हा गप्पाष्टकांचा घोळक्यात न्यूजर्सीहून आलेली मरिया होती. तिचे आईवडील इटलीहून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत येऊन वसलेले. साहजिकच अमेरिकेत वाढलेली असली तरी मरियाच्या बोलण्यात इटालियन लहेजा होता. तिचं बोलणं ऐकताना बीबीसीची ‘माईंड युअर लँग्वेज’ मालिकेची आठवण झाली. गोरा वर्ण, भुरे केस, मध्यम बांधा आणि घरेलू, कुटुंबवत्सल लूक असलेली मरिया प्रवासाने जास्तच थकल्यासारखी वाटत होती.
नमस्कार मंडळी,
मला तातडीने मदतीची गरज आहे. थोडी पार्श्वभूमी -
माझे बाबा, वय वर्ष ९२, आई वय ८४
आई आणि बाबा दोघांनी पॅन कार्ड काढले होते आणि आधार प्रकरण आले तेव्हा त्या साठीही सेंटरला गेले. आईला आधार कार्ड मिळाले पण बाबांचे काही आधार कार्ड होवू शकले नाही. आईचे पॅन आणि आधार लिंकही केले. त्याचे सगळे बँक अकाउंट वगैरे जॉइंट आहे. जॉइंट पैकी एकाचे आहे तेव्हा काळजी नको असे सांगितले गेले.
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.