निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
संत परंपरेत लोक जागर केलेले संत खूप आहेत, पण ते स्वतः, स्वतःला संत मानत नव्हते. आपल्या पेक्षा अधिक ज्ञान असणारे व्यक्तिमत्व, यांना संत वृतीने पहिले जात असे. अशा अनेक संतांच्या नजरेत विठ्ठल ,पंढरी कशी होती ते आज आपण पाहू .
संत सेना महाराज यांनी त्याच्या रचनेत पंढरीस जाणे ,विठ्ठल दर्शन घेणे ,भक्तीत तल्लीन वारकऱ्यांना पाहणे हि सुद्धा एक जीवाला मनःशांती देणारी घटना आहे, हेच सर्वांच्या मनावर अतिशय सोप्या भाषेत बिंबवले आहे. त्यामुळे या पंढरीच्या सोहळ्याचे वर्णन करताना ते म्हणतात -
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आता लवकरच श्री क्षेत्र देहू येथुन संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल . तर श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल.आणि मग पुढील तीन आठवडे आषाढी एकादशी पर्यंत - " बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल … " या जयघोषात पालखी मार्गच नव्हे तर तर प्रत्येक वारकऱ्याचे मन देखील दुमदुमून जाईल.
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि.......
मध्यंतरी एक शेर वाचनात आला -
दिलके आईनेमें है तस्वीर ए यारकी
बस, जरासी गर्दन झुकायी देख ली...
वस्तुतः उर्दू काय, हिंदी काय किंवा मराठी काय - शेरो शायरीमधले मला काहीही कळत नाही- म्हणजे त्यातल्या तांत्रिक बाबी - अलामत, काफिया, मतला वगैरे. पण एखादा शेर का भावतो तर तो थेट मनालाच स्पर्श करतो म्हणून.
आता हा वर दिलेला शेर एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी म्हणत असेल का एखादा भक्त आपल्या ह्रदयस्थ भगवंतासाठी म्हणत असेल ??