नोटाबंदीच्या रडारवर
या नोटाबंदीच्या निर्णयाला
कुणी म्हणे डोळ्यात धूळ आहे
तर हे गरिबांविरोधातील युध्द
अशी राहूल यांचीही हूल आहे
आप-आपल्या विचारांनुसार
कुठे विरोध कुठे समर्थन आहे
मात्र नोटाबंदीच्या या निर्णयात
रडारवरती काळे धन आहे,...?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
डिजिटल धोका
व्यवहार डिजिटल होऊन
कॅशलेस ठरू लागले
पैशांऐवजी व्यवहारात
आता आकडेच फिरू लागले
व्यवहारात आकडे फिरवणे
हा डिजिटल झरोका आहे
मात्र या डिजिटल व्यवहारांना
डिजिटलचाच धोका आहे...?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
ATM ची बोंबाबोंब
हजार पाचशे बंद झाले
दोन हजाराचे सुट्टे नाहित
हमखास सुट्टे देण्यासाठी
कुणी स्वेच्छेने हट्टे नाहित
हा रोकडीच्या समस्यांचा
रोज वाढता कोंब आहे
आत्ता मिळेनात म्हणून
ATM ची बोंबाबोंब आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
कॅशलेस
देश डिजिटल करताना
नव-नवे फंडे येऊ लागले
डिजिटलचं लेबल घेऊन
व्यवहार कॅशलेस होऊ लागले
व्यवहार कॅशलेस केले तरी
रोखीचा फतवा खिजवत बसेल
हाताने पैसे मोजण्याची सवय
रोज-रोज हात खाजवत बसेल
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून रुपये पाचशे व रुपये एक हजार मूल्य असलेल्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा क्रांतिकारी निर्णय भारतीय रिझर्व बँक व भारत सरकारतर्फे घेण्यात आला. या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत बँक खात्यांमध्ये जमा करता येऊ शकतील आणि त्यानंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या ठराविक केंद्रांमध्ये स्पष्टीकरणासह त्या जमा करण्याचा एक अतिरिक्त पर्यायही उपलब्ध असेल. रोखीच्या व्यवहारात वापरात आणण्याकरिता नव्या पाचशे व दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटा छापण्यात येत आहेत. त्यापैकी काही नोटा आता बँकांमार्फत सामान्य नागरिकांपर्यंत पोचल्याही आहेत.
कर्ज वसुलीत
घेताना घेतात
कर्ज भरमसाठ
मात्र फेडताना
फिरवतात पाठ
कर्ज वसुलीसाठी मग
प्रॉपर्टीही जप्त होते
कमावलेली अब्रुही
बदनामीत मुफ्त जाते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी काय करावे लागते?
तसेच पात्रतेचे निकष, नियम व अटी याची माहिती हवी आहे.
धन्यवाद!
सरकारला काही कळते का नाही ? काय चाललेय काय ?
तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या बॅंक कर्मचाऱ्यांची बाजू कोणी घेत नाही असे सरकारला वाटते का ?
अधूनमधून का होईना पण नियमितपणे संप करून सामान्य जनतेची मोठी सोय करणारया कर्तव्यदक्ष संपकरी बॅंक कर्मचाऱ्यांना शासनाने खरे तर चौदावा वेतन आयोग लागू केला पाहिजे ....
फार सोशिक आहेत हो हे लोक ! गळफास लावून मरणारया गोरगरीब भिकारचोट शेतकरयापेक्षाही यांच्यावर जास्त अन्याय होतो !
तरीदेखील नेटाने नोकरी न सोडता फक्त अधून मधून संप करतात ...
मग शनिवार रविवारला जोडून संप केला तर बिचारे थोडं फार आऊटींग का काय म्हणतात ते करू शकतात ...
सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.
