नुकतेच आपल्याकडे चक्रीवादळाच्या प्रभावाने काही जोरदार पाऊस झाले. किनारपट्टीच्या भागातले असे पाऊस म्हणजे निसर्गाचे रौद्र रूप असते. त्याचे कोसळणे हे भयानक असते. त्या तुलनेत माझ्या भागात झालेला पाऊस तसा मध्यमच होता. असाच एक पाऊस खिडकीतून पहात मी खुर्चीवर बसलो होतो. पावसाच्या पडण्याचा आवाज बऱ्यापैकी होता. पाऊस पाहताना मला काहीशी तंद्री लागली आणि मनाने मी कित्येक वर्षे मागे पोचलो. तेव्हाची एक आठवण अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली.
ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.
कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिच्यासोबत संयुक्ता सदस्य 'साया' ने केलेया गप्पांवर आधारीत लेख 'महिला दिना' निमित्त मायाबोलीकरांसाठी प्रकाशित करत आहोत.
![RAHI-6.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28443/RAHI-6.JPG)