मंथन
मनाचं मंथन
आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं
असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ...
का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं ..
बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली.
खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता.
मंथन
श्रावण आला की, सणवारांची गडबड सुरू होते. राखीपौर्णिमा, गौरी-गणपती, नवरात्र, दसरा-दिवाळी सगळे एका पाठोपाठ हातात हात घालूनच येतात. कपडा-लत्ता, दागदागिने, गोडधोड यांची रेलचेल सुरू होते. कितीही काटकसरी गृहिणी असली तरी या दिवसांत हात सैल सोडण्यावाचून गत्यंतर नसते. पाहुणे-रावळे तसेच सणानिमित्त आलेल्या सुट्टीचे बोट धरून केलेले पर्यटन, सगळीकडे पैसा पाण्यासारखा खर्च होतो. खर्चाला कुठे कात्री लावावी तेच कळत नाही.
अशा वेळी दोन-तीन वर्षांपुर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
![Subscribe to RSS - मंथन](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)