आमच्याकडे हुंडा वगैरे घेतला जात नाही, लग्नाचा खर्च वर वधू दोघे अर्धे अर्धे उचलतात, मानपान वगैरे फारसे नसते.. असे म्हणतात, प्रत्यक्ष अनुभवले नाही. कारण माझे लग्न आमच्यात झाले नाही.
माझ्या बायकोकडे मानपान, हुंडा, जावयाचे लग्नाआधीच भरभरून लाड पुरवणे वगैरे भरपूर चालते.. असे ती म्हणते, प्रत्यक्ष अनुभव नाही. कारण मी तिच्याशी पळून लग्न केले. त्यामुळे स्वाक्षरी करायला आलेल्या तिच्या बहिणींनी जी ईवलीशी क्याटबरी दिली तीच गोड मानून घेतली.
पंचिंग बॅग
या ..... ढिशुम ...... या.......धडाम
या .... धप्प ..... या..... ढिशुम
सुचित्राला सईच्या बेडरूमच्या दरवाज्याच्या बाहेर आवाज येत होते , " सई अग जरा धुवायचे काही कपडे असतील तर बाहेर दे , वॉशिंग मशीन लावायचे आहे. " आई प्लिज आत्ता डिस्टर्ब् करू नकोस ना, किती वेळा सांगितलं तुला”.
“ अगं नाश्त्याचे काय ? तुम्हाला नाश्त्याला काय पाहिजे हे विचारायला आले होते , मनासारखा केला नाही तर तुम्हीच न खाता जाता”
“आई एकदा सांगितलं तरी कळत नाही का ग तुला? प्लिज १५-२० मिनिटांनी बोलते”
This poem imagines feelings of a septuagenarian (78 year old) after losing a life-long partner.
सुखास आठवीत का
अश्रू येती लोचनी
जीवनाची खंत का
विरहीं येथ ये मनी
वर्तमान हरवुनी
चित्री तुझ्या गुंततो
झाड फूल पानी मनी
गंध तुझा भासतो
शेवटची भेट तुझी
जपून रोज ठेवितो
पुन्हा गतक्षणात त्या
मी तुलाच शोधतो
मृत्यूची सांग ना
चाहूल का होती तुला
सर्व देउनी पुन्हा
सर्वस्वतव देशीं मला
जोडूनी संसार उभा
तू मला सांभाळिले
रुद्र वादळातहि
तू शीड नाही सोडले
भाग ७-https://www.maayboli.com/node/77860
“खरं सांगू का, याच गोष्टीचा मी गेले काही दिवस विचार करतेय. कदाचित याची पाळंमुळं माझ्या शालेय-महाविद्यालयीन जीवनात सापडतील.” नेहा म्हणाली.
“म्हणजे?”
नेहाने एक लांबलचक सुस्कारा सोडला. “तुला खरचं वेळ आहे का ऐकायला? कारण मी एकदा भूतकाळाबद्द्ल बोलायला लागले की माझे मलाच भान रहात नाही.”
“डोन्ट वरी ,मी माझ्या कामाची सोय लावून आलोय. आणि तू खुपच असंबध्द बोलायला लागलीस तर टोकेन मी तुला” अमोल हसून उद्गगारला.
$1,00,000! आकडा ऐकून, पाहूनही गोर्डनचा विश्वास बसत नव्हता. इतके पैसे आयुष्यात कधी दिसतील अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. आपल्यामुळे असं काही घडू शकतं हा तर फार दूरचा विचार. चालून चालून पायाला आलेल्या फोडांकडे तो बघत राहिला. आपणही कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो हे त्याला पहिल्यांदाच कळत होतं. एक वर्ष! या एका वर्षात हे घडलं त्यावर गोर्डनचा स्वत:चाच विश्वास बसत नव्हता. या एका वर्षाने त्याला बदललं होतं आणि आता तो कितीतरीजणांना बदलणार होता.
मंडळी प्रश्न सिरीयस आहे.
आमचे एक मित्र आहेत. आम्ही राहायला दुसऱ्या शहरात होतो आणि ठरवले की जॉब चेंज करून या दुसऱ्या शहरात जाऊ.. तिथे हे मित्र होते..
आम्हा नवरा बायकोने जॉब स्विच केला आणि त्या शहरात शिफ्ट झालो. या मित्र दांपत्याने आमचे स्वागत केले. कंपनी अकोमोडेशन देत होती तरी पहिले १५ दिवस त्यांनी आपल्या घरी राहायची सोय केली. आम्हीदेखील आनंदाने राहिलो. मात्र त्यांना खर्च नको म्हणून ग्रोसरी वगैरेआणली, बाहेरून जेवण वगैरे मागवले तर बिल आम्ही देऊ लागलो.
तर झालेय असे, कि माझ्याकडे आणि माझ्या मामेसाबांकडे एवढ्यातल्या एवढ्यात आसपास अनेक लग्नाळू मुला मुलींची स्थळे व माहीती गोळा झालेली आहे. योगायोग म्हणा किंवा काहीही.. पण एका जवळच्या मैत्रीणीकडे आणि तिच्या आईकडेही अशीच बरीच स्थळे व त्यांची माहीती गोळा झालेली आहे. त्यात कोणत्या मुलामुलींच्या अपेक्षा एकमेकांशी मॅच होतात ते शोधून शोधून आम्ही एकमेकांना पाठवतो आहोच. पण या सगळ्यात काही वेळ द्यावा लागतो आहे आणि हे सगळे एफर्ट्स अन-ऑर्गनाईझ्ड पद्ध्तीने चालू आहेत.शिवाय आमच्याकडे असलेल्या कोणाच्याच अपेक्षेत न बसणारे पण अनेकजण आहेत.
भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते?
भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे.
जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे.
अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवींग्ज केले असतील तर काही वर्षे तेच जपून वापरावे लागतात नाहीतर मग त्यांना आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहावे लागते.
व्रण
त्याने तिच्या खांदयावर सहेतुक हात ठेवला. तिने त्याच्याकडे वळून बघितले, तिच्या डोळ्यात एक नकार होता.
पण त्याने न जुमानता हट्टानेच तिला जवळ ओढले.
"माझे तुझ्यावर २० वर्षांपूर्वी जेव्हढे प्रेम होते त्यापेक्षा जास्त आत्ता आहे आणि उद्याही राहील" असे म्हणून त्याने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तिचा पदर खाली ओढला त्याक्षणी तिच्या डोळ्यातून दोन थेम्ब खाली ओघळले. …
तुम्हाला सांगते, या सासू लोकांना त्यांच्या नवऱ्यांना आणि सूनांना छळायला काहीही निमित्त चालतं.. कोरोनामुळे तसंही सासूने कामवालीला कल्टी देऊन, तीला दिल्या जाणाऱ्या पगाराचे पैसे भिशीत फिरवून माझ्या साध्याभोळ्या सासऱ्यांना कामाला जुंपलंय.. कोरोना येण्यापूर्वी काय रूबाब असायचा त्यांचा म्हणून सांगू..अगदी ठाकूर भानुप्रतापच..जागेवर बसून फक्त चहाची ॲार्डर सोडायची आणि घरकामात मदत मागितली की लगेचच स्कुटीला टांग मारून भाजी आणायच्या नावाखाली अख्खं ठाणं पछाडून यायचं..