दोघी...!
______________________________________
तिला जाग आली तेव्हा मध्यरात्र होती .. गेले कित्येक रात्री तिला झोप येत नव्हती .. आज कुठेतरी डोळा लागला तर अचानक अशी झोपमोड झालेली..!
आता पुन्हा झोप येणं शक्य नव्हतं ... तिला वाटलं , युगानुयुगं आपण जणू जागेच आहोत .. कुठल्याही शिक्षेपेक्षा भयंकर अशी ही शिक्षा आपल्याला मिळाली आहे..
तिने दिवा लावला .. समोर सारं नेहमीचं ओळखीचंच होतं.. भिंतीवर लावलेला गणपतीचा फोटो , कोपऱ्यातला फ्रीज , त्यावर काही औषधांच्या बाटल्या ..!
त्या दोघी
त्या दोघींमधलं नात अजूनही मला अनोळखी वाटत, दोघी एकमेकींची काळजी घेतात, त्या एकमेकीवर अवलंबून आहेत म्हणून की प्रेम आहे देव जाणे
पण त्या नेहमी एकत्र असतात , अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी.
एकदा महाराष्ट्र टाइम्स मध्ये 'दोघी' या चित्रपटाविषयीचा लेख वाचनात आला. सुमित्रा भावे यांनी लिहिलेला. याआधी मी सुमित्रा भावे यांचं नाव ऐकलं नव्हतं. सुमित्रा भावे यांनी मराठीतल्या अनेक उत्कृष्ट संवेदनशील सिनेमांचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. अस्तु , कासव या सिनेमांची नावं माझ्या कानावरून गेली होती पण यांचं लेखन दिग्दर्शन त्यांनी केलंय हे मला माहीत नव्हतं. लहानपणी टीव्हीला दहावी फ नावाचा सिनेमा अनेकदा लागायचा. तो पण यांचाच आहे हे विकिपीडियावर पाहिल्यावर कळलं. घो मला असला हवा हा राधिका आपटेचा सिनेमा एकदा टीव्हीवर लागला म्हणून सहज पाहिला. ती ही सुमित्रा भावेंचीच एक हलकीफुलकी कलाकृती होती.