बरयाच दिवसान् पासुन राजमाचीवर पावसाळा सोडुन दुसरया त्रुतुत जायचा विचार होता, पण योग काहि जुळुन येत नव्हता. अचानक आसमन्त ग्रुपचा मेल आला, ९-१० डिसेम्बरला राजमाचीचा बेत आहे. लवकर नावे नोन्दवा. इन्द्राला फोन केला तर त्याचा आधीच रायगडावर जाउन महाराजाना मुजरा करायचा बेत पक्का झाला होता. होना करता अखेर नाव नोन्दविन्याकरता फोन केला तर जागा आधिच भरलेल्या होत्या. वाटले की परत सन्धी हुकली. जरासा नाराज
झालो पण मनात म्हट्ल, Better Luck Next time.
सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं...
२-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...

माझ्या मैत्रीणीची मुलगी अवनी हिच्या ट्रेक चे हे वर्णन तिच्या आईने सांगितलेले.
हीच ती चिमुकली हिरकणी अवनी आपटे.
Exiting and popular trek ,fort Alang, Madan and Kulang.(Around 5000 ft.--level of kalsubai)
Location--Bhandardara Dam, Egatpuri Region, Near mountain Kalsubai, Sayadri Range, Maharashtra..India
Event Organiser--Serac Club,Pune
Duration-- 3days 4 nights
Age Limit--Above 15 years..
Child Name--Avani Apte (mother --Varsha apte)
Date of Birth-6th nov. 2004
ही भटकंती महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्गम तालुक्यांपैकी एक असणाऱ्या वेल्हा तालुक्यातील आहे आणि मग खडा सह्याद्री उतरून थेट कोकणात शिरायचे आहे. खड्या चढाचे डोंगर, विरळ मनुष्यवस्ती, पायवाटांचा सुळसुळाट - त्यामुळे हमखास वाट चुकण्य़ाची शक्यता, आजुबाजुला (बऱ्यापैकी श्वापदविरहित) जंगल, भरपूर शांतता ह्या गोष्टी म्हणजे कलंदर भटक्यांसाठी पर्वणीच!
शनिवारी (२६डिसें) कंपनीच्या अॅन्युअल पार्टी वरून घरी जाताना रूपेशने (ऑफिसमधला मित्र)विचारले "उद्या तेलबैला 'क्लायंबिंग- व्हॅली क्रॉसिंग- रॅपलींग' आहे, येतोयस ना? माझा लगेच होकार. तिथे सकाळी ७:३०- ८:०० वा पोहचायचे होते..

१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.
ट्रेकर्सलोकांची पंढरी म्हणुन प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड अनेक संधी मिळुनसुद्धा पहायचा राहिला होता.. पण अचानक माझ्या आवडत्या "ट्रेक मेटस" ग्रुप बरोबर जाण्याची संधी मिळाली.. ती सुद्धा "हरिश्चंद्र व्हाया नळीची वाट" या मार्गे !!!
हरिश्चंद्रगडावर जाण्यास असलेल्या अनेक वाटांपैंकी दोन नंबरची ही अवघड वाट.. एक नंबरवर अर्थातच कोकणकडाची वाट आहे !!
बर्याच वर्षांपासून महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील बागलाण प्रांतात जायची इच्छा होती ती साल्हेर व मुल्हेर या किल्ल्यांमुळे. परंतू जायचा कधी योग येत नव्हता. यतीन तिथे ट्रेक टाकतोय कळल्याबरोबर जायचं ठरवलं. इच्छा कितीही असली तरी दुखणार्या गुडघ्याचा मोठ्ठा प्रश्न होता. पण या वेळेस काहीही झाले तरी जायचंच असं ठरवलं कारण अशी संधी परत आली नसती. बरोबर आवडतं मसक्युलर स्प्रेनचं क्रीम व नी कॅप घेतली आणि ट्रेकला जायची तयारी सुरू केली. ट्रेक ३ दिवसांचा होता व फक्त साल्हेर, सालोटा हेच किल्ले न करता बरोबर मुल्हेर व मोरा हे २ किल्ले ही करायचे होते. माझ्यासाठी हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा... सारखं झालं.