गणेशोत्सव : काळानुसार कधी बदलणार आपण ???
मला एका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडायची आहे..
कित्येक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती, चिमण्या गणपती, नातूबाग अशा सारखी मंडळे त्यांच्या दिमाखदार लायटिंग साठी सुप्रसिध्द आहेत.. पण मला सांगा, हे लायटिंग आपण ३ मिनिटांच्या पेक्षा जास्त पाहू शकतो का? तिथल्या स्पीकर्स ने छातीत धडधडायला लागायच्या आत आणि त्या गलिच्छपणे नाचणार्यांच्या चेंगराचेंगरीत सापडायच्या आत आपण तिथून काढता पाय घेतो.. मग कशासाठी हा अपव्यय??