मुक्तक-विचार-जीवन

उम्मीद पे दुनिया कायम है... ?!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज ३० नोव्हेंबर २०१०... आज तिची आठवण अधिकच गडद झाली...मलाच नाही तर तिच्या जवळच्या, तिला ओळखणा-या सगळ्यांच्याच मनात.
तसं पाहिला गेलं तर तिचा आणि माझा सहवास काही दिवसांचा (काही तासांचा खरं तर !). पण तरीही मला तिचं प्रसन्न व्यक्तीमत्व, चेह-यावरचं मुक्त पण निरागस हसू, डोळ्यातली चमक, मुख्य म्हणजे तिचं full of life असणं आवडायचं. का माहित नाही, जास्त कधी बोलायची संधी (असून) मिळाली नाही तरीही मला ती आवडायची... जवळची वाटायची !

विषय: 
प्रकार: 

ओ कलकत्ता!

Submitted by ज्योति_कामत on 18 September, 2010 - 12:42

गेल्या वर्षी युनियनच्या कॉंफरन्सच्या निमित्ताने कलकत्त्याला गेले होते. बरोबर 2 मैत्रिणी होत्या. वास्को- हावडा एक्सप्रेसने आम्ही कलकत्त्याला पोचलो. महिला वर्गासाठी रहाण्याची उत्तम सोय गुजरात समाजाच्या लॉजमध्ये केली होती. तर कॉन्फरन्स “महाजाति सदन” मध्ये बडा बाजार रस्त्यावर होती. बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सकाळी ते पाहिलं.

गुलमोहर: 

किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

Submitted by भानस on 31 August, 2010 - 10:56

' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.

गुलमोहर: 

माझा बसप्रवास

Submitted by ज्योति_कामत on 28 August, 2010 - 16:00

तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.”

गुलमोहर: 

खीर

Submitted by भानस on 20 August, 2010 - 13:04

तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्‍या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मुक्तक-विचार-जीवन