JaD Jahala Deh aisa
DeVhi Aata Posat naahee
Mazhya aart GaNyala Yaa
Sooraancha Bharahi Sosat naahee
Bhogale Je Sarv Kaahi
Paaphi an PuNya Saare
Launi GaNite Jagachi
Swargaas mee Pohachat naahee
Band Netranchi Katha Mi
Sangato Ekant Deshi
Ughadata Netri kunachi
Saawaleehee Disat naahee
Ghar mhanave ki Durava
Rahate hi Fakt aatma
Deh Ka Japato Jiwant
Mazhe Malahi Kalat naahee
Shwas gheta tar Jiwant
Netri Drushyachich Khant
KaL TaLato mhanun jagane
Ase Ata Jagawat naahee
Ahe Na, Urala Kuni
Pratimecha zalo RuNi
Ka Vicharu mi Jagala
Maz Aarasa Olkhat naahee..
संपली जवळीक ना !
तूसुद्धा अगतीक ना !
आत लाव्हा घुसळतो
वरुन सारे ठीक ना !
फावले त्यांचे कसे ?
भेकडांचे पीक ना !
काय दुःखाला हवे ?
आसवांची भीक ना !
भाव आहे चांगला
वेदनेला वीक ना !
कान का किटले असे ?
तेच ते बौद्धीक ना !
बघता बघता विझले डोळे
हसता हसता भिजले डोळे
आठवणींचे वादळ आले
एकाएकी थिजले डोळे
दु:खाला मी तासत गेलो
माझ्या नकळत झिजले डोळे
ह्या अश्रुंचे आधण झाले...
आयुष्याचे शिजले डोळे!
स्वप्नांचा हा जागरगोंधळ
नाही माझे निजले डोळे
--- मयूर
नव्व्याणवास शंभर म्हणतो
मातीला मी अंबर म्हणतो
रोज भोगून घेतो शिक्षा
रोज प्रार्थना नंतर म्हणतो
हिरव्या भगव्या रंगांमधले
'मिटेल केव्हा अंतर?' म्हणतो
जीवन म्हणजे साधासोपा
सुखदु:खाचा संगर म्हणतो
तुला पाहून झाले चालू -
मनात जंतरमंतर म्हणतो!
- मयूर
जाळणे वणव्याप्रमाणे! जीवघेणे
चांदणे शिंपून जाणे! जीवघेणे
नाव ओठांवर कुणाचे घेत नाही
दर्द का घाली उखाणे जीवघेणे?
एक तर गिरवायची वाळूत नावे
त्यात लाटांचे बहाणे जीवघेणे
कबुतरांना तारणारे कोण आता?
जर शिबी पाळे ससाणे जीवघेणे
भुलून गंधाला त्यांच्या, सारेच असतात जवळ जात
काटे घेतात रक्त शोषून नि गुलाब लाल होतात
चंद्र चमकतो अंधारात, चोरून सूर्याचा प्रकाश
कातडे ओढून का कुठे गाढवांचे वाघ होतात?
भारतातले सामान्य लोक, म्हणे जास्त अन्न खातात
पदोपदी बघ चकवा आहे.
किरण तमाहुन फ़सवा आहे.
रांगेमध्येच जीवन सरले
सांग मोजुनी कितवा आहे..!
दोन्ही हातां पाचच बोटे
कसला डावा उजवा आहे..!
त्यांची हृदये ‘दगडी’ झाली
मजला म्हणती हळवा आहे..!
अरे किनार्यासाठी नाही,
(गझल पूर्ण झाल्यावर दुसरा मतला सुचला, तो ही सध्या लिहिलाय इथे)
एकमेकांचाच दोघा भार होता
दाखवाया तो सुखी संसार होता
यौवनाचा मांडला बाजार होता
पाहणार्याचा म्हणे व्यभिचार होता!
घास माझा पाहुण्यासाठी दिलेला
हाय, कसा विश्वास हरवला
समर्पणाचा ध्यास हरवला ।
तुझ्यासंगती दरवळलेला
उरातला तो श्वास हरवला ।
सातजणांना पुरुन उरे, तो
तिळाएवढा घास हरवला ।
जगण्याला धुंदी स्वप्नांची
विस्मृतीत इतिहास हरवला ।
युगाहुनी मोठा असणारा
बाजाराचा ओसरला भर
उजाडले, पदराला सावर
काठ्यांच्या गर्दीत विसरता
गोवर्धन "त्या" करंगळीवर
नीळकंठ व्हा पुन्हा शंकरा
मासे तडफडती काठावर
का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
हाय सुखांचे हे शरपंजर