'मायबोली'वर आपण नेहमीच नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवत असतो. तुमच्या सहभागामुळेच ते उपक्रम वाढीस लागतात.
'मायबोली'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं, हाही या नव्या उपक्रमांचाच एक भाग आहे. याची सुरुवात झाली ती आपल्याच मायबोलीकरांच्या 'शब्द झाले मायबाप' या कार्यक्रमापासून.
आता पुढचे पाऊल टाकत आहोत 'देऊळ' या नवीन मराठी चित्रपटाचे माध्यम प्रायोजकत्व स्वीकारून.
’वळू’ आणि ’विहीर’नंतर उमेश विनायक कुलकर्णी आणि गिरीश पांडुरंग कुलकर्णी घेऊन येत आहेत
एका इरसाल गावाची हलकीफुलकी कथा - ’देऊळ’.
मायबोली.कॉम आणि दै. कृषीवल यांनी ऑगस्ट महिन्यात रसग्रहण स्पर्धेचं आयोजन केलं होतं. १ ऑगस्ट, २०११ ते ३१ ऑगस्ट, २०११ या कालावधीत स्पर्धकांनी मायबोली.कॉमवर आपल्या प्रवेशिका प्रकाशित करायच्या होत्या. एकूण २९ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. श्रीमती सुजाता देशमुख आणि श्री. संजय आवटे या ज्येष्ठ संपादकांनी स्पर्धेचं परीक्षण केलं.
![krushival-maayboli.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u3/krushival-maayboli.jpg)
खरेदीमध्ये ऑगस्ट २०११ मध्ये नव्याने दाखल झालेली काही पुस्तके.
बृहन्महाराष्ट्र मंडळात दर दोन वर्षांनी अधिवेशनाच्या वेळेस खांदेपालट होतो. यंदाही नवीन कार्यकारिणीने सूत्रं हातात घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेलावेअरचे श्री. आशिष चौघुले निवडून आले.
शिकागो येथील अधिवेशनात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे बोर्ड ऑफ ट्र्स्टीजचे सदस्य व नवीन कार्यकारिणी: डावीकडून - श्री ठाणेदार, मोरेश्वर पुरंदरे, आनंद जोशी, आशिष चौघुले, नमिता दांडेकर, सुनील सूर्यवंशी, राहुल कर्णिक, सुचिता कुलकर्णी-लांबोरे व वसुधा पटवर्धन.
![hda2011_newimage_ghoshana_firework.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u410/hda2011_newimage_ghoshana_firework.jpg)
रसिकहो, सप्रेम नमस्कार!
प्रत्येक दीपावली सृजनाचा नवा प्रकाश, नवा आविष्कार घेऊन येते. म्हणूनच कवी गोविंदाग्रज म्हणतात . . .
ही जुनी दिवाळी नव्या दमाने आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गाली।
गणेशोत्सव सरता सरता देशातील, तसेच जगभर विखुरलेल्या साहित्यरसिक मराठी सुजनांना दिवाळी अंकाचे वेध लागतात. आपल्या सुजाण, अभिरुचीसंपन्न मायबोली परिवारात "हितगुज दिवाळी अंकाचे" अनन्यसाधारण महत्व आहे.
ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥
मराठी मातीच्या आणि मराठी माणसाच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे प्रेम, श्रद्धा, भक्ती खरी बहरून येते ती गणेशोत्सवाच्या काळात! जागोजागी गणेशभक्तांचे मेळे, मंडपांत विराजमान गणपती बाप्पा मोरयाच्या आगमनार्थ रचलेले सोहाळे, रोषणाई - सजावटी - मंगल आरत्या, पठणांसह घरांघरांतून उत्साह, मांगल्य व आनंदाला आलेले उधाण... खास महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होणारा असा हा उत्सव! ढोल, ताशे, झांजांच्या गजरात वाजत-गाजत येणार्या गणरायांच्या आगमनाची प्रत्येक घरातून सारे वर्ष आतुरतेने वाट पाहिली जाते.
पहिल्यांदा घरात गणपती बसवायचा हट्ट धरला तेव्हा आम्ही भावंडं सात-आठ वर्षांची असू. त्या आधी का कुणास ठाऊक, पण आमच्या घरात गणपती बसवण्याची प्रथा नव्हती. दादांनी या गोष्टीला आधी नाही म्हणून पाहिलं. त्यामागचं कारणही तसंच होतं.
रेल्वे स्टेशनावर, किंवा रस्त्यांवर गर्दीत बरेचदा फाटक्या, मळक्या कपड्यातला एखादा बारका हात आपल्या समोर येतो. आपण सवयीनं तिकडं दुर्लक्ष करतो. फारच मागे लागला, तर पोलिसांकडे द्यायची धमकी देतो. मग तो हात दुसर्या कोणासमोर पसरला जातो. हा पसरलेला हात कोणाचा याचा विचार क्षणभरसुद्धा आपण करत नाही, इतकं हे आपल्याला सवयीचं झालेलं असतं.