"आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.
"जितका तुम्हाला आवाज अनोळखी आहे, तितकाच अपरिचित आहे तो तरुण मला, महाराज."
"मला सांग विदुर, कसा दिसतो तो?"
"अलौकिक! सुवर्ण घातले आहे त्याने, महाराज कानांत.....आणि अंगावरचा पोषाखही पूर्ण सुवर्ण आहे."
आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही.....
ते ना महालात बदलले ना गुरुकुलात!
१५ ऑगस्ट १९७७.
बिग इअर रेडिओ दुर्बीनीच्या व परग्रहवासीय शोधमोहीमेच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस. ओहियो स्टेट युनिवर्सिटीमधे ही बिग इअर दुर्बीन १९६३ ते १९९८ या काळात कार्यरत होती. कोलंबस, ओहियो, अमेरीका इथे पर्किन्स ऑब्झरवेटरीच्या प्रांगणात असलेल्या या दुर्बीनिचे मुख्य काम परग्रहवासीयांकडुन आलेल्या रेडिओ संदेशांवर लक्ष ठेवणे असे होते. १५ ऑगस्ट १९७७ या दिवशी ०२:१६ UTC वाजता बिग इअर रेडिओ दुर्बीनिला एक नेहमीपेक्षा वेगळा रेडिओ सिग्नल मिळाला.
भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता. तेही सैनिकांच्या पहाऱ्यात.
"महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला."
"दंश केल्यावर शुद्धीत आला?"
"हो, महाराज."
"याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते."
"नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला.
'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?"
"मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र."
"कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?"
"हो."
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे
मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता
आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता
काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती....
ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती....
ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा
कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा!
मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर
पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर!
ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला!
नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला
"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...."
"बोल."
"वनातून संदेश आला आहे."
काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दासाकडे पाहू लागले.
"पंडुंचे देहावसान झाले."
"पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली.
नंदघरी राहायला यशोदेने रोहिणीला बोलावून घेतले तेव्हापासून नंदाचे घर बलराम आणि कृष्णाच्या किलबिलाटाने भरून गेले होते.
कृष्णाच्या दैवी चमत्काराच्या कैक वार्ता हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरत होत्या. त्याच्या निळ्या रुपाची आणि विशाल काळभोर नेत्रांची भूल पडणार नाही अशी एक गोपिका गोकुळी मिळाली तर नवल!
पेटता पेटता विझलो कधी
माझे मलाच कळले नाही
दिला होता शब्द खरा
पण काय ते नीट आठवलेच नाही
या स्मृतीला कोण जाणे
कुणाचा विखारी दंश झाला
जो तो ओळखीचा असूनही
इथे मलाच परका झाला
कोणता हात धरू मी ?
कोणता सोडून देऊ ?
या हातांच्या विळख्यातच
माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला
समजत होतो धुरंधर स्वतःला
पण या हळव्या हृदयाने घात केला
मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास
पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला
इथेच घेतली समाधी मनाने
इथेच माझा अंत झाला
हाच तो विखारी दंश होता
दुर्दैव आणि शाप एकाच घराण्याला गिळंकृत करू पाहत होते. एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वसूदेव, कारावास ! माता पित्यांपासून दूर देवकीनंदन कृष्ण गोकुळात वाढत होता आणि त्याचा आत्मबंधु युधिष्ठिर आणि सोबत वायुपुत्र भीम राजमहालापासून दूर वनातल्या कुटीत.
कुंतीने मंत्रशक्तीने इंद्राला पाचारण केले.
काळंभोर ढगांची गर्दी झाली आणि शुभ्र विजेचा झोत येत तेजस्वी रुप समोर आले.
"प्रणाम इंद्रदेव!"
"कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?"