विषय क्रमांक ३ - स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती - कांदबरी - संधिकाल
Submitted by मोहना on 14 August, 2013 - 08:47
स्वातंत्र्यानंतरच्या भारतातल्या प्रगतीचा, अधोगतीचा, राजकारणाचा, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनाचा आलेख म्हणजे ’संधिकाल’ ही कादंबरी. मध्यमवर्गीय भिकोबा आरस आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर वाचक त्या त्या काळात त्याच्यांबरोबर वावरायला लागतो, आपल्या मतांना पुन्हा जोखून पाहतो इतकं प्रभावी व्यक्तिरेखाटन आणि काळाचं चित्र ’संधिकाल’ मधून मधु मंगेश कर्णिक घडवितात. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील मराठी मध्यमवर्गियांचा, आपली संस्कृती व मूल्ये जपत जगण्यासाठीचा आणि नव्या विस्मयकारक बदलात टिकून राहण्याचा संघर्ष म्हणजे ’संधिकाल’.
शब्दखुणा: