Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्ना......................
स्वप्ना....................... _____/\_____
कित्त्त्त्त्ती ग राग काढशील घनावर!!!!!!!!!!
घनश्याम बाबा एक काम मस्त
घनश्याम बाबा एक काम मस्त करतो,
laptop च flap उघडणे आणि बन्द करणे.>>> तो कि बोर्ड बडवतो, शेवटच्या कि वर जोररात टिचकी मारतो आणि लगेच laptop च flap बंद करतो.
'आपलं हे घर कल्पवृक्षासारखं आहे, हा कल्पवृक्ष तुला वाढवायचा आहे राधा'....माईआजी फारच डँबिस आहे. स्वतःच्या नातवाला समज द्यायची सोडून राधाला उगाच लेक्चर (सगळे माहित असून)... छळवाद मांडलाय राधाचा!
आज फक्त शेवट पाहिला.
आज फक्त शेवट पाहिला. माईआज्जीची दया आली. तिनही मुले नेभळट आहेत, आता नातुही त्याच वळणावर चाललाय.. बहुतेक माईआज्जोबाही असेच होते.. आज्जीने खंबीरपणे इतकी वर्षे घर संभाळलं आणि आपल्या मागे ते तसेच चालावे म्हणुन राधाला मनवतेय. आपले घर नीट राहावे अशीच धडपड चाललीय बिचारीचि.
खरे तर आता अशी वेळ आली आहे
खरे तर आता अशी वेळ आली आहे की
१. कुहूने हे दाखवावे की कवितांमधून दिसते त्यापेक्षा जास्त मॅच्युरिटी आपल्यात आहे.
२. माउलीने काळ्यांच्या खाल्लेल्या नमकाला जागावे. माईंकडून शिकलेल्या चार गोष्टी वापराव्यात.
३. घरातल्या बाया माणसांना किचनमधून बाहेर काढावे.
४. आणखी एका आघाडीवर प्लॅन करावा, वाटल्यास राधाच्या बॉसला, पाणीपुरीवाल्याला, इंदूरच्या काकाला, टकलू सम्याला घोळात घ्यावे, त्यांना एकदा ब्लफमास्टर दाखवावा.
आणि गोड शेवट करावा.
कुहूला ही सिचुएशन एनकॅश करता आली तर राजवाड्यांच्या पुढच्या मालिकेचा ऑडियन्स कमी (तरी) होणार नाही.
बाकी काही नाही तर एकदाच घनाला
बाकी काही नाही तर एकदाच घनाला चांगलं वागताना किंवा घनाबद्दल कुणी खरंच चांगलं बोलताना दाखवा! गेले २-४ एपिसोड अगदी वाघासमोरची शेळी झालाय तो! :|
खरं तर मला या सगळ्या लोकांनी मक्ता उचलल्यासारखा राधा-घनाचा संसार सावरणं अशक्य डोक्यात जातय. विनय आपटेचे डायलॉग्ज बरे आहेत त्यामानाने. त्याला आजिबात आवडत नाहीये नाटक व सरळ समोरासामोर बसून प्रॉब्लेम सोडवा म्हणतोय तो कायम. नशीब एक तरी माणूस सेन्समध्ये बोलतोय. बाकी आज्जी,विनोदकाका,अबिर्,प्राचीआत्या सगळ्यांनाच आवरा म्हणायची वेळ आलीय!
बस्के + १ एक विनय आपटे सोडून
बस्के + १
एक विनय आपटे सोडून सगळी कॅरॅक्टर्स पकाउ झालीयेत अता!
>>एक विनय आपटे सोडून सगळी
>>एक विनय आपटे सोडून सगळी कॅरॅक्टर्स पकाउ झालीयेत अता!>>
विनय आपटेचे संवादच फक्त छान दाखवलेयत प्रत्यक्ष कृती मात्र काही नाही. तो अबीरला स्पष्ट शब्दात घरातुन जायला का सांगत नाहीय? मालिका ११ ऑगस्टला संपणार असेल तर त्याने निदान अबीरला १५ दिवसांची मुदत देऊनतरी घरातुन निघुन जायला सांगताना दाखवल पाहिजे होत. आपल्या एकुलत्या एका मुलीचा (ते सुद्धा आईवीना वाढवलेल्या) संसार असा तुटताना खरतर कोणाचे वडिल गप्प बसतील? त्यात अबीरचा निर्लज्जपणा बघुन तर डोकच गरम झाल पाहिजे. सगळ्यांना आजारी पाडुन झाले आता शेवटचा उपाय म्हणुन निदान राधाला तरी आजारी (कोणीतरी सुचवल्याप्रमाणे तीच अॅक्सीडंट तरी) पाडा आणि घना-राधाला जवळ आणा. असो ह्या मालिकेत आणखीन किती सावळा गोंधळ घालतायत बघु
दिग्याकाकाच्या 'बायका अश्या
दिग्याकाकाच्या 'बायका अश्या घाबरल्या म्हणजे पुरुषांना मस्त वाटतं' ह्या वाक्यावर मला 'ते स्वतः घाबरले नसतील तर' अशी टिपण्णी जोडावीशी वाटली. दिग्याकाकाच्या ह्या वाक्यावर लग्न झालेल्या तमाम बाया (बापड्या)चं आणि पुरुषांचं मत ऐकायला आवडेल.
वर सुप्रियाकाकू 'तुम्ही अशी कामगिरी पार पाडलीत ना की मग स्वयंपाकघरात देवकीवहिनी माझं कौतुक करतात' म्हणाली. ह्यावर मज पामराच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं.
१. नवर्याने मर्दुमकी गाजवली तर त्यात बायकोचं कौतुक का व्हावं? बरं ह्या कौतुकाचा आणखी एक तोटा असतो. ह्या एका मर्दुमकीनंतर नवरा अनेक वेळा गाढवपणा कराय्चे चान्सेस जास्त. मग ते खापर बायकोच्या डोक्यावर फुटणार ना. ही अनिष्ट प्रथा बंद व्हायला हवी.
२. देवकीवहिनी 'स्वयंपाकघरात'च का बरं कौतुक करणार? दिवाणखान्यात, गॅलरीत वगैरे जाहिर कौतुक करण्यास मनाई आहे का? "बाईची अक्क्ल चुलीपुढे" ह्या जुनाट विचारसरणीचा प्रसार केल्याबद्दल राजवाडे आणि कंपनीचा निषेध
३. नवर्याने स्वतःच्याच कुटुंबासाठी काही केलं तर त्यात कौतुक करण्यासारखं काय आहे? वो तो उसका फर्ज है.
माईआज्जी किती ते फुटेज खात आहेत? ते खाऊन खाऊनच त्यांचं पोट भरलेलं दिसतंय म्हणून जेवत नाहियेत
स्वप्ना काल वल्लीने तुझं
स्वप्ना काल वल्लीने तुझं म्हननं खरं केले.. " माई आज्जींची आता प्रत्येक गोष्टीत सवय झालीये" हे बोलुन..
माईआज्जी किती ते फुटेज खात
माईआज्जी किती ते फुटेज खात आहेत? ते खाऊन खाऊनच त्यांचं पोट भरलेलं दिसतंय म्हणून जेवत नाहियेत <<
मालिका ११ ऑगस्टला संपणार असेल
मालिका ११ ऑगस्टला संपणार असेल तर त्याने निदान अबीरला १५ दिवसांची मुदत देऊनतरी घरातुन निघुन जायला सांगताना दाखवल पाहिजे होत>>>
बंडुपंत - आवडल
बाप रे कालचा खूपच पकाऊ एपिसोड
बाप रे कालचा खूपच पकाऊ एपिसोड होता.
याच माईआज्जींनी आपल्या मुलीचं लग्न टिकावं म्हणून तरूण पणात नाही का काही प्रय्त्न केले? आत्ता म्हातारपणात जिवाला कित्ती क्लेश देताहेत!..... नातवाचं लग्न लग्न टिकावं म्हणून!
कुहु चे नाव खरचं कुहु आहे की
कुहु चे नाव खरचं कुहु आहे की काळे कंपनी तिला लाडाने कुहु म्हणतात?
भारतात विचारतात मॅरीटल स्टेटस
भारतात विचारतात मॅरीटल स्टेटस एकदम पहिल्या मुलाखतीतच.
(ही माहीती कशाशी खातात ते त्यांनाच माहीती)
>>>नवर्याने मर्दुमकी गाजवली
>>>नवर्याने मर्दुमकी गाजवली तर त्यात बायकोचं कौतुक का व्हाव>><<
प्रत्येक यश्स्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते.. ह्या उक्तीवर आधारीत असेल.
राधाच्या डोचक्यावर जबाबदारी टाकायची... पुन्हा जुनीच प्रथा.. बाईच घर उभारते.
किती ते सोशल कंडीशणींग
अश्याने हे. क. ब. प्रश्ण पडलाय?
मलाही हाचं प्रश्न होता की
मलाही हाचं प्रश्न होता की कुहुचं खरं नाव काही वेगळं आहे का ? सुरुवातीपासून बघणारे प्रकाश टाकू शकतील
घना= तात्या विंचू. दिग्याला
घना= तात्या विंचू.
दिग्याला शंखपुष्पी सिरप द्यायला हवे. ग्रो सम ब्रेन्स मॅन. आणि त्या माऊचा हा हिरो. सच लो एक्स्पेक्टेशन्स फ्रॉम लाइफ. छ्या! एकदा तरी लिस्सन? काल त्यांना बघून हताशच झाले मी.
इतकं का करताय?
इतकं का करताय? माऊ-दिग्यामध्ये त्यांच्यात्यांच्यापुरतं प्रेम आणि अंडरस्टँडिंग आहे की. लिव्ह इट अॅट दॅट. माऊ चांगला अभिनय करते. तिचा आणि तिच्या मुलीमधला एक प्रसंग फार गोड होता ३-४ दिवसांपूर्वी.
पौ, +१ ते एक स्वयंपाकघरातल्या
पौ, +१
ते एक स्वयंपाकघरातल्या कौतुकाचं वाक्य सोडलं तर त्यांच्यामधलं प्रेम छान दाखवलं.
स्वप्ना, शेवट आवडला.
घनाचं तेल, तूप आणि धुपाटणं
घनाचं तेल, तूप आणि धुपाटणं सगळं जातं..केएफसी>> :))
ते एक स्वयंपाकघरातल्या कौतुकाचं वाक्य सोडलं तर त्यांच्यामधलं प्रेम छान दाखवलं>> +१००
राधा नी पासपोर्ट वरचा नाव का
राधा नी पासपोर्ट वरचा नाव का बर बद्लून घेतल, आज काल नोकरी करणार्या मुली नहि बदलत नाव. अणि एथे तर सगळा माहीति असाताना कसा काय बदलाल?
ती म्हणते पप्पांनी सांगितलं
ती म्हणते पप्पांनी सांगितलं म्हणून बदललं. धन्य आहे ती!
राधा नी पासपोर्ट वरचा नाव का
राधा नी पासपोर्ट वरचा नाव का बर बद्लून घेतल, >>> ह्याचाच अर्थ, राधा- घना शेवटी "नांदा सौख्यभरे" असा काळेवाडीचा आशीर्वाद घेत फायनली कोकण्/केरळ/उटी/शिमला/कोडाई/मुन्नार पैकी कुठेतरी जाणार... (हिंट दिलीये राजवाडेंनी ) आणि अबीर "जोरका झटका, कसा दिला?" अशी रायासाहेबांना टाळी देत एक्झिट मारणार!
आणि आपण टाळ्या वाजवूया...
अग, पण
अग, पण कोकण्/केरळ/उटी/शिमला/कोडाई/मुन्नार ला जायला त्यांना पासपोर्ट कशाला लागणार? मला तर अमेरिकेत जातात का काय असं वाटतंय. बिच्चारे अमेरिकन्स, आधीच इकॉनॉमी खराब झाल्याने भंजाळलेत.....त्यात एकादशीच्या घरी ही महाशिवरात्र.....तेरा क्या होगा ओबामा?
अगो स्वप्ने, अमिरिकेला दोघेही
अगो स्वप्ने, अमिरिकेला दोघेही नै जाणार, पापो वर पत्ता नी आडनाव काळे करून घेतलंय, म्हणजे मॅम पर्मनंटली काळेवाडीतच र्हाणार, असे म्हंतेय
ती म्हणते पप्पांनी सांगितलं
ती म्हणते पप्पांनी सांगितलं म्हणून बदललं >>>> मग पपानी सान्गितल म्हणून खरखर लग्न कसा नाही केल राधा नि काहीच्याकाही
खरच कैच्या कै दाखवतायेत आता.
खरच कैच्या कै दाखवतायेत आता. :रागः
राधाच स्वतः अमेरिकेला चालली
राधाच स्वतः अमेरिकेला चालली की काय ? घनाला डिपेंडंट व्हिसावर ने म्हणावं
संपदा ...भारी आहे हा
संपदा :फिदी:...भारी आहे हा ट्विस्ट!!
आजच्या एपिसोड्मध्ये प्रभात
आजच्या एपिसोड्मध्ये प्रभात कुहूच्या समोर खरंच पहिलवान दिसत होता.
Pages