रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो. म्हणून अशाच नितांत सुंदर आठवणींच्या अत्तराच्या कुपीला उघडण्याचा हा प्रयत्न.
आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणार्या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी देणारं.
बंगाली माणूषटी : सुजन वाचमन
श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय
इसवी सनाच्या १३०३ साली मेवाड वरती अल्लाउद्दीन खिलजी याने हल्ला केला, तेंव्हा महाराणा हम्मीरचे चुलत भाऊ सज्जन सिंग यांनी कोल्हापुरात आसरा घेतला. सज्जन सिंग नंतर - दिलीप सिंग - शिवाजी प्रथम - भोराजी - देवराज जी - उग्रसेना - माहुलजी - खैलुजी - जनकोजी - सत्तुजी - संभाजी - आणि नंतर बाराव्या पिढीत राजपूत सिसोदिया कुळातील महाराणा प्रताप यांचे वंशज श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.
अनेक वर्षांपूर्वी माझं कोणाशीही पटत नसे. आख्ख्या जगाबरोबर माझे वैर होते. रीडींग बिटवीन द लाइन्स - मधे माझ्याइतके निष्णात अन्य कोणी नव्हते. रीडींग बिटवीन द लाइन्स - आपले विचार, आपले गुणावगुण आणि आपला त्या त्या क्षणीचा मूड अन्य व्यक्तीवरती आरोपित करणे. मी अमक्याला १०० वॅटेज स्मितहास्य दिले व तिने मला, ५० च वॅटेज स्मित परत केले म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे की तिला मी आवडत नाही. सासूबाईंनी गणपती घराच्या अमक्या कोपर्यात ठेवला कारण तो उजव्या सोंडेचा आहे. बरोबर मुद्दाम ठेवला त्यांनी. त्यांना काय पडलीये माझं भलं करण्याची चिंता. अमकीने माझ्याकडे रोखून पाहीलं कारण सरळ आहे मत्सरी आहे ती.
सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
सर्वांना नमस्कार. कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला वक्ता म्हणून एखाद्याला बोलावलं जातं. त्याचं भाषण झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की तो माणूस कोण ज्याने ह्या वक्त्याला बोलावलं! काहीसं तसंच पण वेगळ्या अर्थाने. माझे नांदेडचे आजोबा- श्री. गजानन महादेव फाटक ह्यांचं जगणं बघताना हाच प्रश्न मनात येतो आणि आश्चर्य वाटत राहतं की- बनानेवाले ने क्या खूब बनाया है! अतिशय वेगळं आणि काहीसं दुर्मिळ जगणं ते जगले. कधी कधी ९८ धावांवर एखादी इनिंग थांबते कारण वेळच संपून जातो. फलंदाज नाबादच राहतो. तसं त्यांचं जगणं आहे असं मनात येतं.
एप्रिल १९९८. माझी नववीची परीक्षा संपली. ही सुट्टी काही खरीखुरी सुट्टी नसतेच. मी आणि माझ्याच वयाची मुंबईची माझी आतेबहीण दहावीला शंभर गुणांचं संस्कृत घेणार होतो. माझी जांभूळपाड्याची आत्या संस्कृत शिकवायची. त्यामुळे सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी आम्हा दोघींची रवानगी तिच्याकडे झाली. जांभूळपाड्याची आतेबहीण आमच्यापेक्षा एकच वर्षाने लहान. तिघींचा मस्त कंपू जमला. अभ्यास आणि मौजमजा एकत्रच होऊ लागली. अधूनमधून अभ्यास, बाकी दिवसभर टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकणं, अखंड गप्पा मारणं, बॅडमिंटन, पत्ते, संध्याकाळी टेकडीवर किंवा समोरच्याच पाली-खोपोली रस्त्यावर फिरायला जाणं यात दिवस भराभर जायला लागले.
चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा, उत्साही व्यक्तीमत्व, उद्योजकता असे नानाविध गुण असतात, पैकी तुमच्या मते कोणता गुण हा 'ओव्हर रेटेड' आहे आणि कोणता गुण हा 'अंडर रेटेड' आहे. आणि का? तेव्हा एकोळी उत्तर नको. 'का' या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्यावे.