शाहरूख खानची जीभ छाटणाऱ्यास एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. संगीत सोम यांचे नाव समोर आले होते.
पण आता देवेंद्र प्रसाद पाठक, अनिरुद्ध महाराज, मीरा आणि हिंदू महासभेच्या बऱ्याच जणांचे नाव पुढे येतेय.
प्रश्न हा नाही कि जीभ छाटली तर अभिनयाचै काय? सर्व मुक्यानेच कसे करणार?
कारण हाडाच्या कलाकारांना जुबान महत्वाची नसते. कोशिश मधे संजीव कुमार, पुष्पक मधे कमल हसन ने एकही संवाद न बोलता खुर्चीला खिळेवून ठेवले होते.
रेश्मा और शेरा मधे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा मुके होते. दादा कोंडके पण मुका घ्या मुका मधे मुकेच होते.
धर्मेंद्र गेले ही बातमी विश्वास बसण्यासारखी नव्हती.
कारण चारच दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या. निधनाच्या अफवेने आयुष्य वाढतं असं म्हणतात. या म्हणीचं प्रत्यंतर सुद्धा आलेलं आहे. पण दुर्दैवाने धर्मेंद्र यांना तेव्हढे आयुष्य लाभले नाही.
आजच्या इंटरनेटच्या पिढीला राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद माहिती नाहीत. पण धर्मेंद्र माहीत आहेत. काळ किंचितसा अलिकडचा असेल. चित्रपट क्षेत्रात मात्र ती एक पिढी असते. आमच्या चित्रपटवेड्या घरात मात्र या कलाकारांबद्दला एका पिढीकडून दुसर्या पिढीला या कलाकारांचे किस्से, चित्रपट याबद्दल सांगितलं जातं.
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!
✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील)
✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा
✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द
✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक
✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता
✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ
✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही!
✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य
✪ मैदानावरचं मैदानावर सोडून देण्याची कला!
मडक्यात पाणी नाही दुपार पासून.....
उत्तर: उद्या माठ घासते.
हे रोजच चाललंय गार पाणी नसत घरात.
झाली बडबड चालु चालले तोंड घेऊन.
नीट बोल.
फ्रिजचं पाणी प्या.
मला नको.
रोजची नाटक तुमची......
कॉलेज मधे असताना एका मित्राच्या शेअर मार्केट च्या फर्म मधे बसलो होतो. गर्दी वगैरे नव्हती. तेवढ्यात काळी टोपी, धोतर व कोट घातलेला एक भटका ज्योतिषी तिथे आला. त्याने अल्पावधीतच तिथल्या लोकांवर गारुड घातले. कुंडली पाहून तो ज्योतिष सांगे. मित्राने, त्याच्या भावाने आपापली पत्रिका दाखवून स्वत:ची करमणूक कम उत्सुकता शमवून घेतली. मी तेव्हा नुकतेच व.दा.भटांचे कुंडली तंत्र आणि मंत्र हे पुस्तक वाचून ज्योतिष शिकलो होतो.मला ही वाटले गंमत म्हणुन याला आपली पत्रिका दाखवावी.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते!
मनोज मोहिते
एक हा असा पेंटिंगचा...
तो बिहारमधल्या मुझफ्फरपूरनजीकच्या एका गावचा. चैनपूरचा. ‘शहर से सटा हुआ है यह गांव. शहरी परिवेश और ग्रामीण परिवेश दोनो दिखता है यहां...’ तो सांगत होता. या गावात फर्दो नदी आहे. तिचे नाव नारायणीही आहे. ओळखली जाते, फर्दो म्हणूनच. तो ज्या शाळेत शिकला, त्या शाळेत डॉ. राजेंद्र प्रसाद, राष्ट्रकवी दिनकर शिकले आहेत. गुरुजींमुळे तो चित्रकलेशी जुळला. जवळचा झाला. मधुबनी चित्रशैली शिकला. चित्रे करता करता एक दिवस अचानक घर सोडले. गावातून निघायचेच होते त्याला. जिद्द! आणि तो नागपूरला आला.