कविता

प्रेमकहाणी...

प्रेमकहाणी..

पाहता पाहता विलीन झाले
रोहीत पक्षांचे अबोली थवे
मावळतीच्या रम्य आकाशात;
आता उगवलेचं कोर दुधाळशी
चांदणं झिरपेल संधेच्या प्याल्यात

जेंव्हा बुडायला येईल चंद्र
मी असेल निवांत एकटाच
तळ्याकाठी पहुडलेला आणि

भरून आलेलं आकाश

भरून आलेलं आकाश
गूढ मंद प्रकाश
हवाही स्तब्ध
कुणीतरी भारलेली
कधी कधी मन
येतं ना भरून
कंठ दाटून येतो
डोळे गरम होतात
भरू ही पहातात
पण बरसत नाहीत
आणि सारं निवळतं
न बरसताच
अगदी हळू, सावकाश
तसच हे
भरून आलेल आकाश
मग …..

भाषा

लेखी बोली चित्र मुकी
भाषा येवो कुठल्याही रूपे
कुणा कुणाला भावून जाई
त़र कुणाच्या मनी खुपे

भाषा अगदी पाण्या सारखी
जिला स्वत:चा रंग नाही
देणाऱ्याने दिलेला, घेणाऱ्याने घेतलेला
रंग सदा वाह़त राही

भाषा अगदी पाण्या सारखी

तुझ्यानंतर..

तुझ्यानंतर..

आता उतरेल सांज पापण्यांवर
केशरी किरणे जरा काजळतील
हृदयकमळ आनंदाने फुलून
पाय तळ्याकाठी निघतील

आणि तिथे तू मला भेटशील...

संथ पाण्यावर तरंग उठताना,
कमळदेठ वार्‍यावर डहुळताना,
पांखरांचे सूर मंद होत जाताना,

मृत्यो...

आदिम गाभारा वितळत जाऊन त्याची नितळ वलये सर्व प्रतलांमध्ये पसरत आहेत...
ते एककेंद्री शून्याकार, जे व्यापू पाहतायत अस्तित्वाच्या सर्व मिती...
ते खोल शून्याकार, जे साकार होतायत अंतिम आकर्षणाच्या धूसर रेषांमधून...

सृजन..

पानं गळून पाचोळ्या झालेल्या वाटेवर
पर्णहीन झालेल्या फांदीतून सुर्य येतो
विखरतात कोवळी किरणं अवतीभवती
दवात भिजलेली पाने सजीव होतात
पिकलेले रंग थेंबथेंब ओघळू लागतात
कधीतरी कुजून मातीत मिसळून जातात

पाऊस

पाऊस आला पाऊस आला
चहु बाजूंनी पुकारा झाला

कधी डोंगरावर तर कधी नदीकाठी
जाणवून देतो अस्तित्व तो
मनाचिया कोंदणी प्रियाच्या
रिमझिम जागवून देतो तो

आठवणींच्या कडेकपारी
पाऊस दाटून राहतो नेहमी
उनाड वारा अन् धुंद हवा

तिरळे

उधाणते नजर मावळतीला अन
स्मरणओली वेळ विसावते पापण्यांकाठी
... क्षितिजावरच्या भेटीगाठी!
------------------------------------------

अर्थास शब्द माझा पारखा
उरलो न मी माझ्यासारखा
... तडकलेला आरसा ?

तिरळे

मृत्योर्मा अमृतं गमय |
प्रार्थनेपाशी तर्काचा विलय
ॐ शांति: शांति: शांति: |

***************************

तू उंबरठ्याशी - नसूनही असल्यासारखी
मात्र अवघ्या घरा-अंगणाला पडली तुझी भूल
तू कर्दळीचे फूल ...

चक्र..

चक्र...

जेंव्हा आपण लहान असतो
तेंव्हा फुलपाखरासारखे बागडतो,

जेंव्हा आपण वयात येतो
तेंव्हा उंबराचे फुल होतो,

जेंव्हा आपण मोठे होतो
तेंव्हा सरड्यासारखे रंग बदलतो,

जेंव्हा आपण वृद्ध होतो
तेंव्हा कायमचे कोशात जातो,