मी किंवा मनुष्यप्राण्याने धार्मिक असणं नसणं हे ज्याचं त्याने ठरवायचं असत. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरण दिलयं
इतर धर्माचे लोक हे त्या विशिष्ट धर्माचे कधी ठरतात तर,
त्या व्यक्ति त्या त्या धर्माचं धार्मिक कार्य करतात.
त्यांच्या धर्मात सांगितलेल्या गोष्टींच पालन करतात.
त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन त्यांच्या धर्मात देवाचं ज्या प्रकारचं स्वरूप आहे त्याची प्रार्थना करतात.
वारकरी संप्रदायाचे महत्त्व
वारी आणि वारकरी-
वारी म्हणजे आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून पंढरपूरला केलेली सामुदायिक पदयात्रा. विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला वारते आणि सुखाचा मार्ग दाखवते ती वारी, अशी व्याख्या आपल्याला करता येईल. एकादशीला किंवा इतर पवित्र दिवशी जो नियमित वारी करतो, त्याला ‘वारकरी’ किंवा ‘माळकरी’ म्हणतात. आणि वारकरी जो धर्म पाळतात त्याला ‘वारकरी धर्म’ किंवा ‘भागवत धर्म’ म्हणतात.
वारकऱ्यांची लक्षणे-
*****
श्रीदत्त सोनार
मज दे आकार
फुंक हळूवार
मारूनिया॥
जाळ वळवून
तपे तापवून
किंचित ठोकून
आणे गुणी॥
वितळवी मुशी
दे दोष जाळून
सद्गुण घालून
किंचितसे ॥
करी घडवणं
देऊन आकार
नाम अलंकार
अनाम्याला ॥
नीट घडवितो
परी कर्मागत
जगण्या प्रारब्ध
वाट्याचे ते ॥
" विश्वास " हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे ईश्वरी शक्तींचा स्तोत आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही.
विठु-रखमाई रूप तुझे,
गोजिरवाणे छान!
पाहता तुम्हा मिटे;
व्याकुळ झालेल्यांची तहान!
होता विठु-रखमाई,
नामाचा गजर!
संचारते भक्ती भक्तांमध्ये;
नाम जपी अष्टप्रहर!!
विठु-रखमाई तुझ्या चरणी,
जीवन माझे अर्पण!
भाग्य उजळले माझे;
जेव्हा झाले तुझे दर्शन!!
जयघोष होता तुझ्या नामाचा,
उजळल्या दाहू दिशा;
वाट ही आनंदाची आहे;
संपली सारी दुःखे-निराशा!!
डोळियाचा डोळा
****************
डोळियाचा डोळा
कुणी पाहियला
कळला कुणाला
कधी काय? ॥
शब्दाचा आकार
ध्वनित साकार
येई वाऱ्यावर
पाहिला का ? ॥
चित्र उमटते
डोळात उलटे
परंतु सुलटे
कैसे गमे ?॥
स्पर्श त्वचेवर
विजेची लहर
वाचुनिया तार
धावत असे !॥
घडते घटना
मोडून तर्कांना
शोधुनिया खुणा
सापडेना ॥
तिथे जोडे हात
म्हणून विक्रांत
सर्वज्ञ श्री दत्त
दिगंबर ॥
हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे.
महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले -
"माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?"
"मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही.
याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही."
"एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला. खरंतर त्यात माझा काहीच दोष नव्हता. पण तरीही त्या गाईच्या धन्याचा शाप मला झेलायला लागलाच."
आज सकाळी रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण मालिका डी डी नॅशनल वर पाहिली. तशी ती नेटवर उपलब्ध आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावर लोकांना बघायला मिळेल व टीव्हीवर अधिक चांगलं वाटतं बघताना. सुखद गोष्ट म्हणजे जाहिराती नव्हत्या. शिवाय पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत असे, तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे दूरचित्रवाणी संच नसल्याने त्यांच्यापैकी काहीजण आमच्याकडे येत मालिका बघायला. दर रविवारी सकाळी प्रसारण होई. आमच्याकडे रंगीत संच नसल्याने माझ्या मनात अजूनही कृष्णधवल रामायणाचीच स्मृती आहे. आता कदाचित बदल होईल त्यामधे.
निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.