ज्यावेळी कळत नव्हतं
चांगलं तुम्ही शिकवलं
जेव्हा जास्त कळू लागलं
वाईटा पासून रोखल
तुमचा मार खाऊन सर
यशाची शिडी चढली भरभर
गर्वात बुडून गेलो असतो
तुम्हीच शिकवलं
नम्रतेने व्हावे सादर
दररोजची प्रार्थना अशीतशीच म्हणायचो
फळ्यावरची सुविचार तुम्ही सांगता म्हणून लिहायचो
कळालं नाही महत्व तेव्हा आता ते कळत आहे
तेव्हा लावलेले बीज फुल होऊन फुलतं आहेत
'शिक्षण' ही समाजाची गरज आहे हे खरे आहे! पण 'शिक्षण' कशाला म्हणावे हे मात्र समाजाला अजून कळले नाही असं कधी-कधी वाटतं. चार पुस्तकं वाचण्याला समाज शिक्षण म्हणत आला आहे. परंतु हे पुस्तकांचे 'शिक्षण' किती फसवे असते असे आज-कालच्या....नव्हे आजच्या शिक्षकांकडे बघून प्रकर्षाने जाणवते. आम्ही ज्या पिल्लै कॉलेज मध्ये शिकलो त्यात अश्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व काही लोकांनी स्वखुशीने केले होते! त्याच 'हिटलरशाही' मध्ये आम्ही काही गोष्टी शिकायचा प्रयत्न केला पण थोड्या दिवसांनी तो नाद सोडून दिला! पण आम्ही पडलो विद्यार्थी! त्यामुळे आम्ही ३ वर्षांनी आनंदाने ह्या कारभाराला राम राम ठोकला!
'शिक्षण' ही समाजाची गरज आहे हे खरे आहे! पण 'शिक्षण' कशाला म्हणावे हे मात्र समाजाला अजून कळले नाही असं कधी-कधी वाटतं. चार पुस्तकं वाचण्याला समाज शिक्षण म्हणत आला आहे. परंतु हे पुस्तकांचे 'शिक्षण' किती फसवे असते असे आज-कालच्या....नव्हे आजच्या शिक्षकांकडे बघून प्रकर्षाने जाणवते. आम्ही ज्या पिल्लै कॉलेज मध्ये शिकलो त्यात अश्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व काही लोकांनी स्वखुशीने केले होते! त्याच 'हिटलरशाही' मध्ये आम्ही काही गोष्टी शिकायचा प्रयत्न केला पण थोड्या दिवसांनी तो नाद सोडून दिला! पण आम्ही पडलो विद्यार्थी! त्यामुळे आम्ही ३ वर्षांनी आनंदाने ह्या कारभाराला राम राम ठोकला!