या कहाण्यांनी मला काय दिलं? इतका जमाखर्च अजून मांडला नाही. कधी फार व्रत केली नाहीत, जी एक-दोन हातून घडली त्यात श्रद्धा कितपत नि परक्या गावात ‘सोशलायझेशनार्थ’ कितपत हे ही उमगलं नाही. माझ्या टिवल्याबावल्या सोसल्याबद्दल श्रद्धेने व्रते करणाऱ्यांची मी ऋणी आहे. उतराई होण्यापेक्षा काही ऋणातच मोक्ष आहे _/\_. काहींनी अजून कथा सुचवल्या पण त्या नंतर कधी लिहीन. ह्या श्रावणातील ही शेवटची कथा…
__________________
भाग १ वाचायचा असल्यास. नाहीतर जसा 'धूम' कुठलाही भाग पाहिला तरी चालतो तशी ही कथा आहे. आधीच्या भागात दोन बहिणी असतात, एक कथा ऐकल्याने श्रीमंत रहाते, तर दुसरी न ऐकल्याने गरीब होते एवढे एकोळीचे कथानक घडले आहे.
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या.
-(नॉर्थ इंडियन प्रोड्यूसर असेल तर ह्या पांढऱ्या हाफ साडीत, साऊथ इंडियन असेल तर श्रीदेवीच्या ‘ताथैय्या ताथैय्या’ ड्रेस मध्ये मात्र रुद्राक्षासहित दिसतील. आपला मराठी प्रोड्यूसर असल्याने मगनलाल ड्रेसवालाचा ‘कर्नलच्या पोरी तुझे हिथं काय काम गं’ ड्रेस मध्ये नागकन्या देवकन्या भेटल्या).
आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी,
(खादाडबोदला!! इतकं खायचं की गोष्टीपुरतं ही “न्याहारी” म्हणायची चोरी, जेवणच क्रियापद हवं . सगळ्या कहाण्यांच्या सुरूवातीस “क्ष” सुना आवश्यक असतात.)
वाचायचा असल्यास मंगळागौरीची कहाणी भाग १ ह्या धाग्यावर प्रतिक्रियात कुठेतरी आहे. जसा फास्ट अँड फ्यूरिअस कुठलाही भाग पाहिला तरी समजतो तसेच ही कथा कुठूनही सुरूवात केली तरी समजते. मुलगा अल्पायुषी आहे हे भविष्य एवढीच महत्त्वाची घटना मागच्या भागात आहे.
कहाणी मंगळागौरीची (भाग २)-
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गांव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना.
(सॉंग सिच्यूएशन आली ना बाप्पा सुरुवातीलाच आणि रखरखीत जागेचं गाणं लागेल - "सारी के फॉल-सा मॅच किया रे" द्या वाजवून. उंट, वाळवंट सगळं आहे)
जळदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. "राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल."
(देवता लोकांचा एच आर झोपला काय? असल्या मागण्या करणारीला “देवता” पोर्टफोलियो का दिला आहे अजून ??)
चातुर्मासाच्या कथा हा आपल्या लोकपरंपरेचा वारसा आहे. त्यातील लयवेल्हाळपण, भाबडेपण आकर्षक आहे आणि काळ बदलला तरी परिकथेसारख्या एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे त्या जात आहेत. ह्या कथा टिकायला हव्या. त्या नव्या स्वरूपात लिहीण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही पण जरा मजेशीर प्रश्न विचारून कुणा समर्थ लेखकाला 'क्या किजिएगा इस स्टोरी का?' ह्याचे उत्तर द्यायला भाग पाडायचे इतपतच धाग्याचा उद्देश. धार्मिक भावना दुखावण्याचा, खिल्ली उडवण्याचा अजिबात उद्देश नाही. जरा सजगपणे वाचू इतकंच!!
मूळ कथा विनाकंस, सी ताईची कॉमेंट्री कंसात.
_______________________
चातुर्मासाच्या कथा हा आपल्या लोकपरंपरेचा वारसा आहे. त्यातील लयवेल्हाळपण, भाबडेपण आकर्षक आहे आणि काळ बदलला तरी परिकथेसारख्या एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे त्या जात आहेत. ह्या कथा टिकायला हव्या. त्या नव्या स्वरूपात लिहीण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही पण जरा मजेशीर प्रश्न विचारून कुणा समर्थ लेखकाला 'क्या किजिएगा इस स्टोरी का?' ह्याचे उत्तर द्यायला भाग पाडायचे इतपतच धाग्याचा उद्देश. धार्मिक भावना दुखावण्याचा, खिल्ली उडवण्याचा अजिबात उद्देश नाही. जरा सजगपणे वाचू इतकंच!!
मूळ कथा विनाकंस, सी ताईची कॉमेंट्री कंसात.
____________________________________________