लहानपण आपण कधीच विसरत नाही.
बालपण जिथे गेले तिथे खूप वर्षांनी पाय ठेवल्यावर मन भरून येतं.
जिथे खेळ खेळलो त्या जागांकडे नजर जाते.
तिथे काही बदल झाले असतील तर मन खट्टू होतं.
बालपणीची सर्वात सुंदर, मजेशीर आठवण काय असेल ?
ज्यांनी ती अनुभवली नाही त्यांना कळणार नाही कि त्यांनी काय मिस केलं ते !
ती म्हणजे बहीण भावंडांची भांडणं.
अगदी मारामार्या पण.
बहीण नेहमी तक्रारी करतेच. पण कधी कधी भाऊ पण तक्रार करायचा.
पण कुणीही तक्रार केली तरी ओरडा त्यालाच पडलाय हे तुमच्याकडे व्हायचं का ?
आपापल्या कोण्या एका मित्राच्या फोटोंवर, रापचिक, कड्डक, छावा अशा शब्दांपासून सुरु झालेला प्रवास 'जाळ आणि धूर संगटच' , 'टांगा पलटी घोडे फरार', 'विषय खोल' सारख्या एकोळ्यां मार्गे पुढे जाऊन उखाणे म्हणून चांगलाच रुजला आणि फोफावला.
माझ्या बघण्यात आलेले प्रकार म्हणजे
प्रकार १ - भावाला कोणत्यातरी प्रसिद्ध नटाचे वगैरे नाव देणे
१. फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी
२. पोह्याला दिली फोडणी, फोडणीत टाकले जिरे-मोहरी, कडीपत्ता अन् हींग,
भाऊच्या फोटोला बघुन पोरी म्हणतात हाच माझा 'कवळा कबीर सिंग'!
भाऊ छोटा असो वा मोठा
असतो काळजाचा तुकडा
चैन पडत नाही बहिणीला
पाहिल्या शिवाय त्याचा मुखडा
त्यातून छोटा असेल भाऊ तर
जरा जास्तच लाडका असतो
नवीन काय आणलं त्याने की
पिंगा मागे पुढे घालत असतो
कसा दिसतो शर्ट म्हणून
दंगा नुसता घालतो
छान आहे म्हणाल्या शिवाय
शर्टच घालत नाय
मागे पुढे घालत राहतो
नुसतीच रुंजी
पैलवान म्हणून चिडवायची
सोडत नाही संधी
मोठा झालास राजा आता
किती ही सांगा
माझ्या साठी कधी घेतो
पप्पांशी पंगा